वाद पेटला; भाजपच्या आठ आमदारांचा विविध समित्यांचा राजीनामा

मुख्यमंत्र्यांवरभाजपने एकाधिकारशाहीचा आरोप केला आहे.
Eight BJP MLAs tender resignations from the Chairmanship of Assembly Committees
Eight BJP MLAs tender resignations from the Chairmanship of Assembly Committees

कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) भाजपच्या (BJP) पराभवानंतर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व आमदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांची तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) घरवापसी झाली होती. रॉय यांच्यावर तृणमूलने मोठी जबाबदारी टाकली आहे. लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. याचवेळी भाजप नेत्यांना मात्र विधानसभेच्या समित्यांमध्ये नगण्य स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांतच भाजपच्या आठ आमदारांनी विविध समित्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (Eight BJP MLAs tender resignations from the Chairmanship of Assembly Committees)

आठ आमदारांच्या राजीनाम्याने बंगालमधील राजकारण पुन्हा तापले आहे. या आमदारांमध्ये मिहीर गोस्वामी, मनोज टिग्गा, कृष्णा कल्याणी या बड्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यांनी बंगालमधील विविध विधीमंडळ समित्या आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  पक्षाने दिलेल्या आदेशानुसार 9 जुलै रोजीच राजीनामा दिल्याचे समोर आलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपने एकाधिकारशाहीचा आरोप केला आहे. 

विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी नुकतीच लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी रॉय यांची निवड केली आहे. विधानसभेच्या इतर समित्यांमध्ये भाजपच्या नेत्यांना अतिशय कमी स्थान देण्यात आले आहे. यामुळे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे संतापून सभागृहातून बाहेर पडले. यापुढे विधानसभेच्या कोणत्याही समितीचे अध्यक्षपद भाजप स्वीकारणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षाचा आमदार असतो, असा प्रघात आहे. परंतु, सत्ताधारी तृणमूलने या नियमाचा भंग केला, अशी टीकाही अधिकारी यांनी केली होती. 

अधिकारी म्हणाले होते की, लोक लेखा समितीत 20 सदस्य असतात. आम्ही आमच्या 6 आमदारांची नावे दिली होती. मुकुल रॉय यांच्या नावाची शिफारस भाजपने केली नव्हती. त्यांनी जाहीरपणे भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. अर्थतज्ञ व आमदार अशोक लाहिरी यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी व्हावी, अशी आमची मागणी होती. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले होते. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होते. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com