Delhi Govt Vs LG : दिल्ली केजरीवालांचीच ! ; न्यायालयाचा मोदींना दणका ; बदल्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडून आलेल्या..

Delhi Govt vs LG case Verdict : सत्यमेव जयते, .. केजरीवाल यांना त्यांचा अधिकार मिळाला .
Delhi Govt vs LG case Verdict news
Delhi Govt vs LG case Verdict newsSarkarnama

Delhi Govt vs LG case Verdict : महाराष्ट्र सरकारच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देण्यापूर्वी अजून एक मोठा निर्णय दिल्ली सरकारबाबत आज दिला. (supreme court big decision on transfer posting of officers)

राजधानी दिल्लीतील प्रशासकीय सेवांच्या नियंत्रणावरुन केंद्र आणि दिल्ली सरकार यांच्यात अनेक वर्षांपासून असलेल्या वाद आज न्यायालयांच्या निर्णयामुळे संपुष्टात आला.

केंद्र आणि दिल्ली सरकारचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पाच सदस्यीय घटनापीठाने १८ जानेवारी रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टांच्या निकालानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालामुळे दिल्लीचा विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Delhi Govt vs LG case Verdict news
Supreme Court : न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया , सत्याचा विजय झाला..; आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं..

दिल्लीमध्ये निवडणूक आलेल्या सरकारला प्रशासकीय सेवांवर अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल न्यायालयानं दिला आहे.त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांचा बदल्या आणि त्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार दिल्ली सरकारकडे असेल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांवर दिल्ली सरकारचाच अधिकार, नियंत्रण असावे, असे न्यायालयाचे मत न्यायालयानं नोंदवले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि एलजीच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असला तरी त्याला जमीन, पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्थेबाबतचा अधिकार केंद्र सरकारला असेल, असे न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहे.

Delhi Govt vs LG case Verdict news
Supreme Court Hearing on ShivSena : सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रात काय म्हटलयं ? कोश्यारींनी बहुमत चाचणी..

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेले अनेक निर्णय नायब तहसिलदार यांनी रोखून धरले होते. यावरुन केजरीवाल सरकार आणि नायब तहसिलदार यांच्यात नेहमी वाद झाले आहेत. हा वाद न्यायालयात पोहोचला होता. दिल्ली आम आदमी पार्टी आणि एलजी विनय कुमार सक्सेना यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

दिल्लीचा विकास जोमात होईल, सगळ्यांना शुभेच्छा..

निकालानंतर दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी टि्वट केलं आहे. "सत्यमेव जयते, अनेक वर्षांनंतर न्यायालयानं केजरीवाल यांना त्यांचा अधिकार मिळाला आहे. दिल्लीच्या जनतेच्या विकासात कोणताही अडथळा येणार नाही, हा जनतेचा विजय आहे. आता दिल्लीचा विकास जोमात होईल, सगळ्यांना शुभेच्छा!," असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com