दुसऱ्या लाटेपेक्षा भयानक स्थिती : भारतात कोरोना संसर्गाचा वणवा

मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
Corona

Corona

Sarkarnama

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Corona) संसर्ग वाढीचा वेग आता चांगलाच वाढला असून दुसऱ्या लाटेचा विक्रमही मोडित निघाला आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron) हा संसर्ग वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीच स्पष्ट केले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये देशाची सर्वाधिक आर नॉट व्हॅल्यू 1.69 एवढी होती. आता तिसऱ्या लाटेच्या सुरूवातीलाच हा दर 2.69 टक्क्यांवर पोहचला आहे.

भारतात बुधवारी सुमारे 91 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 6.43 टक्क्यांवर पोहचला असून मृत्यूदरही वाढला आहे. बुधवारी 24 तासांत 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाख 85 हजाराच्या पुढे गेली आहे. तर बुधवारी सुमारे 19 हजार 200 रुग्ण बरे झाले. सध्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.81 टक्के एवढे आहे.

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
काँग्रेसला धक्का; दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेतून आलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव (Dr. Balram Bhargav) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सध्या वाढत असलेल्या संसर्ग ओमिकॉनमुळे वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये सध्या वेगाने वाढ होत आहे. प्रामुख्याने महानगरांमध्ये रुग्णसंख्या अधिक आढळून येत आहे. ता. 30 डिसेंबर रोजी पॉझिटिव्हिटी दर 1.1 टक्के एवढा होता. आता हा दर पाच टक्क्यांवर गेला आहे.

देशात 30 डिसेंबर रोजी 13 हजार नवे रुग्ण आढळून आले होते. मंगळवारी हा आकडा 58 हजारांवर तर बुधवारी 90 हजारांवर पोहचला. 'महामारी वेगाने पसरत असल्याची ही स्थिती आहे. आर नॉट व्हॅल्यू सध्या 2.69 एवढी आहे. दुसऱ्या लाटेत जेव्हा सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते तेव्हा हा दर 1.69 एवढा होता. यावरून सध्याच्या संसर्गाचा वेग लक्षात येतो. आतापर्यंतचा हा सर्वाधिक वेग आहे,' असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
धक्कादायक : जीएसटीचे सहआयुक्त राजेसाहेब माने बेपत्ता झाल्यानं खळबळ

संसर्ग वाढत असला तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. दिल्लीमध्ये हे प्रमाण 3.7 टक्के तर मुंबईत पाच टक्के आहे. मागील वर्षी हेच प्रमाण 20 टक्के एवढ होते. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. पण नागरिकांनी सतर्क राहत कोरोना नियमांचे पालन करायला हवे, असे आवाहनही पॉल यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह (Maharashtra), पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, झारखंड आणि गुजरात या राज्यांमध्ये रुग्ण वेगाने वाढत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com