नाराज नेत्यांची मोठी मागणी सोनिया गांधींनी केली नामंजूर; आता प्रत्येक राज्यात असणार नवी समिती

काँग्रेसमध्ये पुन्हा संसदीय बोर्ड निर्माण करण्याची मागणी करण्यात आली होती.
Congress Chintan Shivir Latest Marathi News
Congress Chintan Shivir Latest Marathi NewsSarkarnama

उदयपूर : काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या जी 23 गटाला पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागला आहे. या गटाने पक्षात पुन्हा एकदा संसदीय बोर्ड निर्माण करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण हा प्रस्ताव काँग्रेसच्या कार्यकारी समितीने नामंजूर केला आहे. त्यामुळे आता हे नेते काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे. (Congress Chintan Shivir Latest Marathi News)

राजस्थानातील उदयपूरमध्ये रविवारी काँग्रेसच्या तीन दिवसीय 'नव संकल्प चिंतन शिबीरा'चा समारोप झाला. या शिबीरात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये अनेक संघटनात्मक बदल होतील, अशी अपेक्षा नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Congress Chintan Shivir Latest Marathi News
काँग्रेस देश पिंजून काढणार; ऐंशी वर्षांपुर्वी महात्मा गांधींचा 'भारत छोडो'चा नारा अन् आता भारत जोडो!

याअनुषंगाने जी 23 गटाने पक्षात पुन्हा संसदीर्य बोर्ड निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण हा प्रस्ताव चिंतन शिबीरात मंजूर करण्यात आला नाही. त्याऐवजी आता केंद्र व प्रत्येक राज्याच्या स्तरावर राजकीय धोरणे व महत्वाचे निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र राजनीतिक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पी. व्ही. नरसिंगराव हे पंतप्रधान झाल्यानंतर संसदीय बोर्ड बरखास्त करण्यात आलं होतं. त्यानंतर नाराज नेत्यांनी पहिल्यांदाच ही मागणी केली होती. पण हे बोर्ड स्थापन झाल्यास पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे अधिकार कमी होतील, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे. तसेच तिकीट वाटपासह महत्वाचे निर्णयही हेच बोर्ड घेईल, असं काही नेत्यांचं म्हणणं. सध्या या निर्णयांसाठी स्वतंत्र समिती आहे.

पक्षाच्या संघटनात्मक बदलासह अनेक महत्वाचे ठरावे या शिबीरात केले जाईल, असं सुरूवातीलाच सांगण्यात आलं होतं. त्यानुसार 'एक व्यक्ती एक पद' आणि 'एक कुटुंब एक तिकीट' या धोरणांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Congress Chintan Shivir Latest Marathi News
काँग्रेसचं ठरलं! अखेर तिकीट वाटप अन् पदांबाबत घेतला मोठा निर्णय

दरम्यान शिबीरात 'एक परिवार एक तिकीट' च्या महत्वाच्या प्रस्तावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. नेत्याच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला तिकीट हवे असेल तर त्याने पक्षात किमान पाच वर्षे काम केलेले असावे, ही अट कायम ठेवण्यात आली आहे. यातून गांधी कुटुंबाचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

50 वर्षांखालील नेत्यांसाठी 50 टक्के पदं

पक्षात तरूणांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी 50 वर्षांखालील नेत्यांना 50 टक्के पदांवर नियुक्ती दिली जाणार असल्याचा महत्वपूर्ण ठरावही शिबीरात करण्यात आला आहे. मागील काही वर्षांत पक्षात तरूणांना संधी मिळत नसल्याचा आरोप अनेक तरूण नेत्यांनी केला होता. त्यातून काही नेते पक्षातूनही बाहेर पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com