यंग ब्रिगेडमधील गळती अन् काँग्रेसने उत्तर प्रदेशात गमावला ब्राह्मण चेहरा

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसने उत्तर प्रदेशातील ब्राह्मण चेहरा गमावला आहे.
congress loose prominent brahmin face in uttar pradesh after jitin prasada jons bjp
congress loose prominent brahmin face in uttar pradesh after jitin prasada jons bjp

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापासून झाली होती. आता प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. पक्षाकडून डावलले गेल्याने प्रसाद यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे काँग्रेसने उत्तर प्रदेशातील एक ब्राह्मण चेहरा गमावला आहे. 

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. यंग ब्रिगेडमध्ये शिंदे यांच्यासह सचिन पायलट, मिलिंद देवरा आणि जितिन प्रसाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. 

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज होते. 

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे भाजपला जितिन प्रसाद यांच्या रुपाने एक ब्राह्मण चेहरा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांना विश्वासात घेतले जात नव्हते. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतही त्यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यांचा जिल्हा असलेल्या शहाजहानपूरमध्येही जिल्हाध्यक्षांची निवड करताना त्यांना विचारण्यात आले नव्हते. समाजवादी पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांना शहाजहानपूरमध्ये महत्व दिले जात होते. त्याचवेळी निष्ठावंत असलेल्या प्रसाद यांना डावलले जात होते. 

माजी केंद्रीय मंत्री असलेले जितिन प्रसाद हे 47 वर्षांचे आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या. त्यांचा 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांत पराभव झाला होता. पक्षातील फेरबदलांबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्येही प्रसाद यांचा समावेश होता. 

Edited by Sanjay jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com