काँग्रेसनं रजनी पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

पाचही राज्यांमधील निवडणुकीनंतरच्या पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे.
MP Rajani Patil
MP Rajani PatilSarkarnama

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील पराभवामुळं काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पाचही राज्यांतील प्रदेशाध्यक्षांना आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे आदेश काढले. या राजीनामा सत्रानंतर आता त्यांनी पाचही राज्यांमधील निवडणुकीनंतरच्या पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाच नेत्यांवर प्रत्येकी एका राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पाच नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील (Rajani Patil) यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांच्यावर मणिपूर, अजय माकन यांच्याकडे पंजाब, जितेंद्र सिंग यांच्याकडे उत्तर प्रदेश तर अविनाश पांडे यांच्या उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते संबंधित राज्यांमध्ये जाऊन तेथील पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतील. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली.

MP Rajani Patil
राजकारण तापलं; पृथ्वीराज चव्हाणांसह नाराज नेत्यांनी ऐनवेळी बदललं बैठकीचं ठिकाण

नाराज नेत्यांची तातडीची बैठक

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसमधील नाराज गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'जी 23' (G 23) मधील काही नेत्यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. त्यातच आता हे नेते आज दिल्लीत एकत्रित येत असल्याने काँग्रेसमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जी 23 मधील बहुतेक नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या घरी एकत्रित आले आहेत.

त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह कपिल सिब्बल (Kapil Sibal), आनंद शर्मा, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शशी थरूर, राज बब्बर, कुलदीप शर्मा आदी नेत्यांचा समावेश आहे. सुरूवातीला हे नेते सिब्बल यांच्या घरी भेटण्याचे ठरले होते. पण ऐनवेळी हे ठिकाण बदलण्यात आले. त्यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ही बैठक आझाद यांच्या घरी पार पडली.

MP Rajani Patil
रजनी पाटील यांनी उपराष्ट्रपतींचं मन जिंकलं अन् सभागृह दणाणलं!

रजनी पाटील यांचे उपराष्ट्रपतींकडून अभिनंदन

मराठीला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी बुधवारी राज्यसभेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी थेट उपराष्ट्रपती व राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनाच साकडं घातलं. 'तुम्ही तुमचे वजन वापरून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मोदी सरकारला सूचना द्या,' अशी विनंती पाटील यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर नायडू यांनीही मराठीतूनच 'तुम्ही चांगलं बोलला' असं म्हणत पाटील यांना दाद दिली. सभागृहातील इतर सदस्यांनीही मग बाके वाजवत पाटील यांच्या भाषणांच कौतुक केलं. (Parliament Session News)

पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत थेट नायडू यांना साकडं घातलं. आपल्या मुद्याच्या समारोपात पाटील नायडू यांना म्हणाल्या की, 'तुम्ही ज्ञानी आहात. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्नही करत असता. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी तुम्ही आपले 'वजन' वापरून केंद्राला तशी सूचना करावी,' अशी विनंती पाटील यांनी केली. त्यांच्या या टिप्पणीवर सभागृहात हास्याची लकेर उमटली. पाटील यांच्या या वजनदार भाषणाचं नायडू यांनीही कौतुक केलं. नायडू यांनी मराठीतूनच दाद देताना म्हटले की, ‘तुमचे अभिनंदन. तुम्ही चांगले बोलला आहात.' यावरही सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवरून पाटील यांना दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com