राहुल गांधी तमिळनाडूत अन् पक्षाचे बंडखोर नेते जम्मू-काश्मीरमध्ये...नेमका हाच मुहूर्त का?

काँग्रेसमधील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. पक्ष नेतृत्वात बदल करण्यावरुन आग्रह धरणारे नेते आता आक्रमक झाले आहेत.
congress g 23 leaders chose time of rahul gandhi tamil nadu visit for shanti sammelan
congress g 23 leaders chose time of rahul gandhi tamil nadu visit for shanti sammelan

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करावा, यासाठी पक्षाच्या  23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे कान टोचले होते. आता पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर या 23 नेत्यांच्या गटाने पुन्हा एकदा पक्षाला जुन्या गोष्टींची आठवण करुन दिली आहे. या नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे प्रचारासाठी तमिळनाडूच्या दौऱ्यावर असल्याचा नेमका मुहूर्त साधल्याने चर्चेला उधाण आले आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. या नेत्यांनी उघडपणे बंडाची भाषा केल्याची टीका पक्षातूनच त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक होऊन पक्ष संघटनेत तातडीने फेरबदल करण्याचा निर्णय झाला होता. याचबरोबर तळापासून संघटनेत निवडणुका घेण्याचेही ठरले होते. मात्र, पक्षाने कोणतीही पावले अद्याप उचललेली नाहीत. 

काँग्रेसमधील नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांच्यासह 23 नेत्यांचा समावेश होता. या 'जी 23' नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आज झालेल्या शांती संमेलनात सहभाग घेतला. या वेळी माजी खासदार गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आदी उपस्थित होते. 

राहुल गांधी हे प्रचारासाठी तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. राहुल यांनी नुकताच दक्षिण आणि उत्तर असा नवा वाद निर्माण केला आहे. नेमके ते तमिळनाडूच्या दौऱ्यावर असतानाच मुहूर्त या शांती संमेलनासाठी काढण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संमेलनात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसने संसदेतून मुक्त केल्याबद्दल अनेक नेत्यांनी जाहीरपणे दु:ख व्यक्त केले. 

या वेळी बोलताना राज बब्बर म्हणाले की, लोक म्हणतात की आम्ही जी 23 आहोत पण मी म्हणतो की आम्ही गांधी 23 आहोत. महात्मा गांधींचा विश्वास, निश्चय आणि विचारातून देशाचा कायदा व घटना तयार करण्यात आली. 'जी 23'ला काँग्रेसला भक्कम करायचे आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com