
Jharkhand News : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ईडीकडून सोरेन यांना गुरुवारी समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगितलं होते, मात्र ते हजर राहिले नव्हते. ईडीच्या कारवाईवर सोरेन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)
रांची जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री सोरेन (Hemenat Soren) यांच्यावर कारवाई सुरू केली असताना, ईडीच्या दुसऱ्या समन्सवरही मुख्यमंत्री हेमंत सोरेन हजर राहिले नाहीत. त्यांनी सीएमओच्या एका कर्मचाऱ्यामार्फत ईडीला पत्र पाठवून ईडीच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याची माहिती दिली आहे.
सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कोणतीही कागदपत्रे ईडीला दिलेली नाहीत. आता ईडी लवकरच मुख्यमंत्र्यांना तिसऱ्यांदा समन्स बजावणार असल्याची शक्यता बळावली आहे. ईडीला पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्या केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला आहे. समन्स पाठवून ईडी राज्यातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा कट रचत आहे, असेही ते म्हणाले होते.
मुख्यमंत्री सोरेन यांच्या म्हणण्यानुसार, 'केवळ त्यांची प्रतिष्ठाच नाही तर झारखंड राज्य आणि तेथील लोकांची प्रतिष्ठाही खराब करण्यासाठी ईडी त्यांना मुद्दाम समन्स पाठवत आहे. गेल्या वर्षभरापासून आपल्याला लक्ष्य केले जात आहे. ईडीवर निशाणा साधत मुख्यमंत्री सोरेन म्हणाले की, 'यापूर्वी ईडीने मला बेकायदेशीर खाण प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांना जमीन घोटाळ्याशी जोडायचे आहे. माझ्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशीलही ईडीला दिला आहे.'
दरम्यान, "जमीन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीने आतापर्यंत १३ आरोपींना तुरुंगात पाठवले आहे."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.