Supreme Court : केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयावर दबाव आहे का? सरन्यायाधीशांनी स्पष्टच सांगितले

CJI D.Y. Chandrachud : या कार्यक्रमात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
CJI D.Y. Chandrachud
CJI D.Y. ChandrachudSarkarnama

CJI D.Y. Chandrachud News : विरोधी पक्षांकडून सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि निवडणूक आयोग तसेच विविध संस्थावर केंद्र सरकारचा दबाव आहे, असा आरोप केला जातो. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी हे आरोप फेटाळून लावले. न्यायालयावर केंद्र सरकारचा दबाव नसल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.

सरकारचा कोणताही दबाव नाही आहे. निवडणूक आयोगाच्या संदर्भात दिलेला निकाल हा हा पुरावा आहे, की न्यायव्यवस्थेवर केंद्र सरकारचा कोणताही दबाव नाही. माझ्या २३ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या केसचा निकाल काय द्यावा किंवा कसा विचार करावा याबाबत दुसऱ्या व्यक्तीने सांगितलेले नाही, असेही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयावर कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CJI D.Y. Chandrachud
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? असीम सरोदे म्हणाले...

यांनी देशातील न्यायव्यवस्थेचे 'भारतीयीकरण' करण्याच्या गरजेबद्दल सरन्यायाधीश बोलत होते. ते म्हणाले, ''न्यायपालिकेचे भारतीयीकरण करण्याचा पहिला भाग म्हणजे भाषा. जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीची भाषा फक्त इंग्रजी नसते. मात्र, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची भाषा ही इंग्रजी आहे.

इंग्रजी ही एक भाषा आहे ज्यामध्ये कायदे व निर्णयांच्या बाबतीत आपल्याला सर्वात मोठी सुविधा आहे. मात्र, जर आम्हाला खरोखरच नागरिकांपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यांना ज्या भाषा समजतात त्या भाषेत पोहोचले पाहिजे. आम्ही आधीच प्रक्रिया सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. न्यायालयातील प्रलंबित खटल्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, आमच्याकडे खटल्यांचा मोठा अनुशेष आहे. त्यातून लोकांचा विश्वासही दिसून येतो. जिल्हा न्यायव्यवस्थे मध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे.

CJI D.Y. Chandrachud
Rajinikanth News : रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा; फोटो शेअर करत आदित्य म्हणाले…

न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे. न्यायव्यवस्था आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करावी लागले. महामारीच्या काळात आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे काम केले ते जगात अभूतपूर्व काम होते. आम्ही घटनापीठाच्या खटल्यांचे थेट प्रक्षेपण सुरु केले आहे. लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे नागरिकांसाठी न्यायालये उघडणे हा माझ्या ध्येयाचा एक भाग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com