मुख्यमंत्र्यांच्या बचावासाठी काँग्रेसचे डझनभर आमदार दिल्लीत

पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर मोठे वादळ उठले आहे.
Congress
Congress

नवी दिल्ली : पंजाबमधील राजकीय संकट अधिक गडद होत चाललेले असताना आता पुन्हा एका छत्तीसगडमधील मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर मोठे वादळ उठले आहे. यापार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील काँग्रेसचे डझनभर आमदार पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

काँग्रेसची (Congress) सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्येही (Chhattisgarh) मुख्यमंत्रिपदावरून (Chief Minister) संघर्ष पेटलेला आहे. विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री असलेले टी. एस. सिंहदेव (T.S.Singh Deo) यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितली आहे. सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी यापूर्वीच दिल्लीवारी केली आहे. दोघांमधील वाद मिटल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अजूनही धुसफूस सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Congress
माजी मुख्यमंत्री जाताना काँग्रेसला खिंडार पाडून गेले!

अजूनही बघेल यांना बदलण्याची चर्चा सुरूच आहे. यापार्श्वभूमीवर बघेल समर्थक डझनभर आमदार बुधवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्षश्रेष्ठींना भेटून बघेल यांना न बदलण्याची मागणी हे आमदार करणार असल्याचे समजते. त्यामुळे छत्तीसगडमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यातील बघेल सरकारने अडीच वर्षांचा कालावधी जून महिन्यात पूर्ण केला. यानंतर सिंहदेव आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रिपदासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. राज्यात काँग्रेसची सत्ता डिसेंबर 2018 मध्ये आल्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असा दावा ते करीत आहेत. यावर बघेल यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अडीच वर्षांसाठी पदाचे वाटप आघाडी सरकारमध्ये असते. छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असल्याचा युक्तिवाद बघेल यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्रिपदाबाबत पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल, असे सांगून त्यांच्याकडून या वादाचा चेंडू पक्ष नेतृत्वाच्या दरबारी टोलावला जातो.

Congress
यूपीएससीत टॉप करताच शुभम कुमार यांची अशीही फसवणूक

विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बनविताना सुरवातीचे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद बघेल यांच्याकडे तर उर्वरित कालावधीसाठी सिंहदेव यांना देण्याचा फॉर्म्युला ठरला होता, असे सिंहदेव समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, बघेल यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचा पवित्रा घेतल्याने सिंहदेव यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडून नाराजी दाखविणे सुरू केले होती. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिल्लीत धाव घेऊन पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com