घोळ संपेना! मुख्यमंत्रिपदाचे दावेदार दिल्लीत अन् केंद्रीय निरीक्षक राज्यात आमदारांकडे

सत्ताधारी भाजपने बहुमताचा आकडा गाठला असून, मुख्यमंत्रिपदावरुन गटबाजी उफाळून आली आहे.
BJP
BJPSarkarnama

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्ताधारी भाजपने 60 पैकी 32 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताच्या आकडा गाठला असला तरी मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री बिरेनसिंह आणि आणि ज्येष्ठ नेते थोंगाम विश्वजितसिंह यांना या आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते दिल्लीत तळ ठोकून असताना केंद्रीय निरीक्षक राज्यात पोचले आहेत.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बिरेनसिंह (N.Biren Singh) आणि विश्वजित यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षा शारदा देवी या 15 मार्चला दिल्लीला दाखल झाले होते. ते 17 मार्चला इम्फाळमध्ये परतले होते. काल (ता.19) पुन्हा भाजप पक्षश्रेष्ठींनी बिरेनसिंह आणि विश्वजितसिंह यांना दिल्लीला बोलावून घेतले. दोघेही पुन्हा दिल्लीला गेले. मात्र, दोघे जाताना वेगवेगळ्या विमानांनी गेले. ते आता दिल्लीत तळ ठोकून आहेत. भाजपने मणिपूरमध्ये (Manipur) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना निरीक्षक नेमले आहे. ते दोघेही मणिपूरला रवाना झाले आहेत. आज दुपारी ते पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील.

BJP
उमेदवारीवरुन भाजपमध्ये वाद! खासदारकीच्या नादात आमदारकीही जाणार?

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले बिरेनसिंह आणि विश्वजित हे दोघेही त्यांच्या मतदारसंघात मोठ्या मतांनी विजयी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी हे दोघांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने अखेर केंद्रीय नेतृत्वानेच सूत्रे हाती घेतली आहेत. मोदी, शहा आणि नड्डा हेच मणिपूरचा पुढचा मुख्यमंत्री ठरवणार आहे. यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या दोन्ही दावेदारांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

BJP
शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात भाजपनं बॉलीवूडमधील हस्तीच उतरवली मैदानात

भाजपने कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता एकला चलोची भूमिका या वेळी घेतली होती. याचवेळी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सहा पक्षांशी आघाडी केली होती. काँग्रेसप्रणित मणिपूर प्रोगेसिव्ह सेक्युलर अलायन्स या आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. भाजपने हा 32 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसने 5 तर काँग्रेसचे सहकारी पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी 7, संयुक्त जनता दल 6 आणि नागा पीपल्स फ्रंट 5 जागांवर विजयी झाले आहेत. यातील नागा पीपल्स फ्रंट आणि संयुक्त जनता दल आता भाजपसोबत जाणार आहेत. त्यामुळे नॅशनल पीपल्स पार्टी आणि काँग्रेस हे दोनच विरोधी पक्ष उरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com