कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारताला सुनावले..शेतकरी लढ्याचे जागतिक पातळीवर पडसाद

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटले असून, हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचे पडसाद आता जागतिक पातळीवरही उमटू लागले आहेत.
candian pm jusitn trudeau supports farmers agitation in delhi
candian pm jusitn trudeau supports farmers agitation in delhi

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनाकडे सुरवातीला फारसे गंभीरपणे न पाहणारे केंद्रातील मोदी सरकार आता खडबडून जागे झाले आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. दरम्यान, या आंदोलनावरुन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू यांनी भारताला सुनावले आहे. 
 
केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांची शेतकरी नेत्यांसोबत विज्ञान भवनात  ही चर्चा होत आहे. या चर्चेला 30 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या चर्चेतून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटू लागले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडू यांनी या प्रकरणी भारताला सुनावले आहे. 
ट्रुडू यांनी म्हटले आहे की, भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. न्याय हक्कासाठी आणि शांततामय मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला कॅनडाने नेहमीच पाठिंबा दिला आहे. आमचा चर्चेवर विश्वास आहे. त्यामुळेच या प्रकरणी भारत सरकारला विविध मार्गाने आमची चिंता कळवली आहे. 

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग सहावा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला होता. काही शेतकरी संघटना बुराडी मैदानावर असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com