तणाव वाढला अन् बंकर, चौक्यांसह दोन राज्यांतील सीमा बनली आंतरराष्ट्रीय सीमा

आसाम व मिझोराम सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. आता सीमेवरील तणाव आणखी वाढू लागला आहे.
bunker and new posts on assam mizoram border after clash
bunker and new posts on assam mizoram border after clash

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. आता सीमेवर केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) तैनात केले आहे. असे असले तरी दोन्ही राज्यांतील वाद आणखी चिघळला आहे. मिझोरामने सीमेवर बंकर तयार केले असून, आसामने सीमेवर नव्या चौक्या स्थापन केल्या आहेत.  

सीमेवरील संघर्षानंतर दोन्ही राज्ये एकमेकांवर आरोप करीत आहेत. वादग्रस्त भागात आसामने नव्या चौक्या उभारल्या आहेत, असा आरोप मिझोरामने केला आहे. याचवेळी मिझोरामने वादग्रस्त भागात बंकर उभारले आहेत, असा आरोप आसामने केला आहे. याचबरोबर दोन्ही राज्यांनी सीमेवर निमलष्करी दले असतानाही त्यांचा बंदोबस्त वाढवला आहे. यामुळे दोन राज्यांतील सीमेवरील आंतरराष्ट्रीय सीमेप्रमाणे बनली असून, बंकर आणि चौक्यांची उभारणी दोन्ही राज्यांकडून सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  
आसाम -मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलाचे सहा जवान मृत्यूमुखी पडले होते तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे  देशभरात खळबळ उडाली होती. आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com