मोठी बातमी : लखीमपूर खीरीत भाजप आमदाराच्या गाडीखाली दोन जण चिरडले

लखीमपूर खीरीमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
BJP MLA Yogesh Verma
BJP MLA Yogesh Verma Sarkarnama

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. आता भाजपच्या (BJP) एका आमदाराच्या गाडीखाली दोन जण चिरडले गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आमदाराचे नाव योगेश वर्मा असे आहे. ही घटना काल (ता.17) रात्री लखीमपूर खीरीमध्ये घडली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (UP Political News Updates)

मृत्यू झालेल्यांची नावे रवी वर्मा (वय 26) आणि विक्रम वर्मा (वय 22) अशी आहेत. ते चुलतभाऊ होते. रवी हा विवाहित होता आणि त्याच्या मागे पत्नी एक अपत्य आहे. आमदार योगेश वर्मा हे विवाह सोहळ्याला हजेरी लावून त्यांच्या स्कॉर्पिओ मोटारीतून जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेले चुलतभाऊही विवाह सोहळ्याला हजेरी लावायला जात होते. ते दुचाकीवरून जात होते. त्यांना पंकीपूर पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओने धडक दिली. दोघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले पण तिथे पोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील स्कॉर्पिओ मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी मोटारीचा चालक मुनिंदरकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी चंद्रशेखर यांनी दिली.

BJP MLA Yogesh Verma
धक्कादायक! कडक लॉकडाऊन असूनही चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी 13 जणांना अटक झाली होती. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

BJP MLA Yogesh Verma
कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं! 24 तासांत तब्बल 90 टक्के रुग्ण वाढले

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिषची 10 फेब्रुवारीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. त्याच्या विरोधात मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. यावर आशिषचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने आजच रद्द केला आहे. तसेच एक आठवड्याच्या आत शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com