UP Election 2022 : मौर्य यांचा भाजपला हिसका; सातवा धक्का देत पाडले भगदाड

स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर तीन दिवसांत सहा आमदारांनी पक्ष सोडला आहे.
Yogi Adityanath, Mukesh Verma, Swami Prasad Maurya
Yogi Adityanath, Mukesh Verma, Swami Prasad MauryaSarkarnama

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपला सलग तिसऱ्या दिवशी धक्का बसला आहे. बुधवारपर्यंत दोन मंत्र्यांसह सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर गुरूवारी सातव्या आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. आणखी काही आमदार भाजपला (BJP) धक्का देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी मंगळवारी (ता.11) राजीनामा दिल्यानंतर पाच आमदारांनी पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर बुधवारी आणखी एक बडे मंत्री दारासिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनी पक्षावर राजीनामा बॉम्ब टाकला आहे. चौहान हे भाजप ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यानंतर आता मौर्य यांचेच समर्थक आमदार मुकेश वर्मा (Mukesh Verma) यांनीही राजीनामा दिला आहे. मौर्य यांच्याविरूध्द बुधवारी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

Yogi Adityanath, Mukesh Verma, Swami Prasad Maurya
काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला! चंद्रकांतदादांनीच दिली कबुली

वर्मा यांनी राजीनामा पत्रात पक्ष आणि योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. आमचे कुणीही ऐकत नाही. पाच वर्षांत दलित, मागास, अल्पसंख्याक समाजातील नेते आणि लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांना सन्मान देण्यात आला नाही. सरकारने बेरोजगार, शेतकरी, दलित, मागासवर्गाची निराशा केली. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. मी स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत आहे, असे वर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर प्रदेशातील भाजपचे 13 आमदार पक्ष सोडणार असल्याचे गौप्यस्फोट नुकताच केला होता. त्यानुसार आतापर्यंत सात आमदारांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे आणखी काही आमदार पक्ष सोडणार असल्याची चिन्हं आहेत. मौर्य यांनी पक्षाला भगदाड पाडल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजपची उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीत खलबतं सुरू असताना राज्यात दररोज धक्के बसत असल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे नेते मंगळवारी (ता. 11) दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसह पाच आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी भाजपला रामराम केला असून, ते 14 जानेवारीला समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे चौघेही मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मौर्य यांच्यानंतर इतर नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com