एअर इंडियाची टाटाला विक्री ही तर 'पाँझी स्कीम'! भाजप खासदाराचा घरचा आहेर

केंद्र सरकारने एअर इंडिया या एकमेव सरकारी विमान कंपनीचे खासगीकरण केलं आहे.
Air India
Air India

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एअर इंडिया (Air India) या एकमेव सरकारी विमान कंपनीचे खासगीकरण केलं आहे. टाटा समूहाला (Tata Group) नुकतीच ही कंपनी विकण्यात आली. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार करत खासगीकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. असे असताना भाजपचे (BJP) खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी यावरून आपल्याच सरकारला अडचणीत आणले आहे.

टाटा सन्समधील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडने 18 हजार कोटी रुपयांना एअर इंडियाची खरेदी केली आहे. हा व्यवहार डिसेंबर अखेरपर्यंत पुर्णत्वास जाणार आहे. एअर इंडिया कंपनीचा तोटा वाढत चालल्याने सरकारने कंपनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. यावरुन स्वामींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, सरकारी कंपनी असलेल्या एअर इंडियाची विक्री ही एक पाँझी स्कीम आहे. एअर इंडियाची खरेदी करणारे यासाठी 15 हजार रुपयांचे कर्ज घेणार आहेत. म्हणजे सरकारने एअर इंडिया ज्यांना विकली त्यांना सरकारी बँका पैसे देतील. यामुळेच ही एक पाँझी स्कीम ठरली आहे.

मागील काही वर्षांपासून खासगीकरणावरून विरोधकांनी धारेवर धरले होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (ता.11) एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या प्रश्नांवर मौन सौडले होते. इंडियन स्पेस असोसिएशन (ISA) या संघटनेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी यावर भाष्य केले होते. यावेळी त्यांनी सरकारच्या सुधारणाविषयक धोरणांवर जोर देत खासगीकरणाचे समर्थन केले होते. ते म्हणाले होते की, यापूर्वी देशाने एवढे निर्णायक सरकार पाहिलेले नाही. एअर इंडियाचे खासगीकरण हे सरकारचे यश असून यावरून सरकारची कटिबध्दता आणि गांभीर्य दिसून येते.

Air India
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मोदींना पुन्हा एकदा जाहीरपणे आणलं अडचणीत

एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह आणि स्पाईस जेट या दोन कंपन्यांनी वित्तीय बोली लावली होती. केंद्र सरकारने एअरलाईन्समधील आपली 100 टक्के हिस्सेदारी विकली आहे. यामध्ये एअऱ इंडियातील 100 टक्के हिस्सा असलेली एआई एक्सप्रेस लि. आणि 50 टक्के हिस्सा असलेली एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे. टाटा कंपनीची बोली अधिक ठरल्याने एअर इंडिया 68 वर्षांनी पुन्हा टाटांकडे आली आहे. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाईन्सच्या नावाने एअर इंडियाची स्थापना केली होती. सरकारने 1953 मध्ये एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतर 68 वर्षांनी टाटांनी पुन्हा एअर इंडियाला समूहात आणले आहे.

Air India
तालिबानच्या राजवटीत मुली शाळांमध्ये परतल्या पण...

दरम्यान, भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली. या कार्यकारिणीमधून स्वामींना वगळण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून स्वामी हे आपल्याच सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. तसेच, वरूण गांधी आणि त्यांच्या मातोश्री खासदार मेनका गांधी यांनाही कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आलेला होता. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आले होते. याचवेळी शेतकरी आंदोलनावरून सरकार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदरसिंह यांनाही वगळले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com