शिवकुमारांची पोलखोल करण्याची जारकीहोळींची घोषणा अन् काही तासांतच माघार

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावरून भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
D.K.Shivakumar and Ramesh Jarkiholi 

D.K.Shivakumar and Ramesh Jarkiholi 

Sarkarnama

बंगळूर : कर्नाटकात स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) भाजपला (BJP) भाजपला मोठा धक्का बसला असून, मुख्य प्रतोदांचाच पराभव झाला आहे. विशेष म्हणजे यात भाजपचे माजी मंत्री व आमदार रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. यानंतर जारकीहोळी यांनी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांची पोलखोल करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली. पण नंतर काही तासांतच ती रद्द केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भाजपचे मुख्य प्रतोद महंतेश कवटगीमठ यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. ते विद्यमान आमदार होते आणि बेळगावमधून रिंगणात उतरले होते. त्यांच्यासोर काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचे आव्हान होते. येथून हट्टीहोळी आणि जारकीहोळी हे विजयी झाले. दुसऱ्या पसंतीच्या मतात जारकीहोळींनी कवटगीमठ यांच्यावर बाजी मारली. विशेष म्हणजे भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांचे ते बंधू आहेत. त्यांनी उघडपणे आपल्या भावाला पाठिंबा दिला होता. भाजपच्या आमदारामुळेच मुख्य प्रतोदांचा पराभव झाल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

या घडामोडींमुळे भाजपमध्ये वादळ उठले आहे. रमेश जारकीहोळी यांनी यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांच्या गुन्हेगारी कारवाया उघड करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. परंतु, ऐनवेळी ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भाजपच्या पराभवावर बोलताना जारकीहोळी म्हणाले की, आम्हाला काँग्रेसला हरवायचे होते परंतु, तसे घडले नाही. मला जे म्हणायचे आहे ते मी पक्षाच्या बैठकीत बोलेन. हे घडणार असल्याचे मला आधीच माहिती होते. कारण काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीनंतर सर्व चक्रे फिरली. या बैठकीबाबत मी आधी पक्षाशी बोलेन आणि नंतर जनतेसमोर ही माहिती उघड करेन.

<div class="paragraphs"><p>D.K.Shivakumar and Ramesh Jarkiholi&nbsp;</p></div>
उच्च न्यायालयाचा दणका अन् आयपीएस रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ

कर्नाटकात स्थानिक स्वराजसंस्था मतदारसंघाच्या निवडणुका 10 डिसेंबरला झाल्या. या निवडणुका 25 जागांसाठी झाल्या. काँग्रेसचे विद्यमान 14 आमदार, भाजपचे 7 तर जेडीएसचे 4 आमदार यांचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपत आसल्याने या निवडणुका झाल्या. यात भाजपला 12, काँग्रेसला 11, जेडीएसला 1 आणि इतरांना 1 अशा जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर विधान परिषदेत बहुमत मिळेल, असा भाजपला कयास होता. परंतु, केवळ एका जागेमुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठला आला नाही.

<div class="paragraphs"><p>D.K.Shivakumar and Ramesh Jarkiholi&nbsp;</p></div>
घराणेशाहीत गांधींनंतर देवेगौडांचा झेंडा; घरातच दोन खासदार अन् चार आमदार!

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्यासाठी या निवडणुका नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या होत्या. त्यांना यात यश आले असले तरी विधान परिषदेतील बहुमत मिळवता आले नाही. विधान परिषदेत बहुमत नसल्याने भाजपला जेडीएसची मदत घ्यावी लागत आहे. भाजपला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. यामुळे आताही भाजपला जेडीएसवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com