दोन गॅंगस्टर पडले योगींवर भारी; भाजपच्या उमेदवारांचा दारूण पराभव

उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा तीन जागांवर पराभव झाला आहे. या तीनही जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.
Raja Bhaiya, Brijesh Singh
Raja Bhaiya, Brijesh SinghSarkarnama

लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीत (UP Election 2022) भाजपला धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रतिनिधित्व करत असलेल्या वाराणसी (Varanasi) मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवाराचा एका गँगस्टरच्या पत्नीने दारूण पराभव केला आहे. प्रतापगड मतदारसंघातही गॅंगस्टरच्या पक्षातील उमेदवार भाजपवर भारी पडला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुंडगिरी संपवल्याचा दावा केला होता. योगींचा बुलडोझर गँगस्टरवर चालल्याने गुन्हेगारी कमी झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे या निवडणुकीत 'बुलडोझर'ची चर्चा होती. पण त्यानंतर काही दिवसांतच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दोन जागांवर गँगस्टरच्या दबदब्यामुळेच पराभव झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

Raja Bhaiya, Brijesh Singh
मोदी-योगींना जोरदार धक्का; वाराणसीत अपक्षाने केला भाजपचा पराभव

इतिहास घडवत विरोधकांना धूळ चारली. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही 36 पैकी 33 जागा जिंकत विरोधकांचा सुफडा साफ केला आहे. पण या निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवाराचा दारूण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघातच भाजपचा पराभव झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

विधान परिषदेच्या (MLC) एकूण 36 जागांपैकी 33 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर तीन जागांवर अपक्षांचा विजय झाला आहे. अपक्षांना वाराणसी, आझामगड आणि प्रतापगड या तीन जागांवर विजय मिळाला आहे. वाराणसी मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुदामा पटेल यांचा पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा सिंह यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. सिंह यांना 4 हजार 234 मतं मिळाली असून सपाला 345 तेर भाजपला केवळ 127 मतं मिळाली आहे. अन्नपूर्णा सिंह या सध्या तुरूंगात असलेला गँगस्टर ब्रिजेश सिंह याच्या पत्नी आहेत.

Raja Bhaiya, Brijesh Singh
केजरीवालांवर नामुष्की; भाजपच्या दणक्यानंतर उचललं मोठं पाऊल

प्रतापगड या मतदारसंघात आमदार रघुराज प्रताप सिंह यांचा दबदबा आहे. त्यांच्या जनशक्ती पक्षाचे उमेदवार अक्षय प्रताप सिंह या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपचा पराभव झाला होता. राजा भैया व ब्रिजेश सिंह हे दोघेही बाहूबली नेते आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा आपल्या भागात वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे मोदी-योगी लाटेतही त्यांनी आपले मतदारसंघ सुरक्षित ठेवले आहेत.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीतही समाजवादी पक्षाकडून भाजपला आव्हान दिलं जाईल, असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात होते. पण प्रत्यक्ष निकालामध्ये वेगळंच चित्र दिसून आलं आहे. एकूण 36 पैकी एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता आलेला नाही. भाजपने 33 जागा जिंकत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. अनेक जागांवर सपाच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com