मोठी बातमी : भाजप अन् काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदानच केले नाही

मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुका झाल्या. या निवडणुकांत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आमनेसामने आले आहेत.
bjp and congress candidates from madhya pradesh did not vote in election
bjp and congress candidates from madhya pradesh did not vote in election

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांत सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. राज्यात आज 28 विधानसभा मतदारंसघात पोटनिवडणुका झाल्या. मात्र, मतदारांना मतदानाचे वारंवार आवाहन करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदानच न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आज राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. 

या पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली होती. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला होता.  

आज निवडणुकीवेळी भाजपच्या एका आणि काँग्रेसचा एका उमेदवाराने मतदानच केले नाही. ही घटना सांवेर मतदारसंघात घडली. भाजपचे उमेदवार तुलसीराम सिलावट आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार प्रेमचंद बौरासी गुड्डू यांनी आज मतदान केले नाही. कारण दोघांचेही नाव या सांवेर मतदारसंघात नाही. सिलावट यांचे नाव इंदोर शहरातील विधानसभा मतदारसंघात आहे. याचवेळी गुड्डू यांचे नाव इंदोर उपनगरातील राऊ विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे ते दोघेही स्वत:च मतदान करु शकले नाहीत. 

सांवेर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. यात सिलावट आणि गुड्डू यांच्यात टक्कर आहे. आता दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मतदानच न केल्याची बाब समोर आली आहे.  

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com