'दारु पिऊन अन् मटण खाऊन पूजा करणाऱ्या ब्राह्मणांबद्दल हजार वेळा बोलेन..'

बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी ब्राह्मणांबद्दल केलेल्या विधानावरून मोठा गदारोळ उडाला आहे.
Jitan Ram Manjhi

Jitan Ram Manjhi

Sarkarnama

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी ब्राह्मणांबद्दल केलेल्या विधानावरून मोठा गदारोळ उडाला आहे. माझी यांनी आधी केलेल्या विधानावर माफी मागून वादावर पडदा टाकला होता. परंतु, आता पुन्हा मांझी यांनी वादग्रस्त विधानाचे समर्थन करीत नव्याने वक्तव्य करुन वाद वाढवला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील सत्ताधारी आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

(Bihar) संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार आहे. मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा हा पक्ष राज्यातील सत्तेत सहभागी आहे. मांझी यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म आणि ब्राह्मणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उडाला आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू झाला आहे. ब्राह्मण संघटना आणि भाजपच्या नेत्यांकडून मांझींचा निषेध करण्यात येत आहे. अनेक ब्राह्मण संघटनांनी मांझी यांचा पुतळा जाळला आहे.

<div class="paragraphs"><p>Jitan Ram Manjhi</p></div>
माजी मुख्यमंत्र्यांची जीभ कापणाऱ्यास भाजपचा नेता देणार अकरा लाख रुपये!

मांझी म्हणाले की, मी ब्राह्मण समाजाबद्दल काहीही बोललो नाही. मी केवळ चुकीच्या पद्धतीने पूजापाठ करणाऱ्यांबद्दल बोललो आहे. अशा ब्राह्मणांना श्लोक अथवा ग्रंथांबद्दल काहीही माहिती नसते. ते केवळ वर्तमानपत्र हाती घेऊन पूजा करतात. ते स्वत:ला पुजारी म्हणवून घेतात. मटण खाऊन आणि दारु पिऊन पूजा सांगायला येणारे लोकही आहेत. असे लोक अनुसूचित जातीतील कुटुंबामध्ये जाऊन पूजेच्या नावाखाली पैसे घेतात परंतु, त्या घरातील अन्न आणि पाण्याला शिवत नाहीत. अशा लोकांबद्दल मी एक वेळा नव्हे तर हजार वेळा बोलेन.

<div class="paragraphs"><p>Jitan Ram Manjhi</p></div>
भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे कसं घेणार? फडणवीसांनीच सांगितला मार्ग

दरम्यान, मांझी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. त्यांनी नितीशकुमार यांच्याकडे 1 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. ते म्हणाले की, माझा मुलगा संतोष कुमार यांच्या फंडात 1 हजार कोटी रुपये न टाकल्यास मी महाआघाडीकडे पलटी मारेन. माझ्या मुलालाही मी 1 हजार कोटी रुपयांच्या योजनांचा आराखडा बनवण्यास सांगितला आहे. या पैशातून अनेक योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. गया जिल्ह्यात या निधीतून विकासकामे केली जातील. आता मी आयुष्यातील अंतिम खेळी खेळत आहे. त्यामुळे विकासासाठी जे करता येईल ते मी करेन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com