भाजप आमदाराची स्टंटबाजी; राजीनामा लिहिला पण विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहचलाच नाही!

परिक्षेच्या गैरव्यवहारात बंधूला अटक केल्याने राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली होती.
BJP
BJPSarkarnama

पाटणा : परिक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात बंधू अडकल्याने बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारणमधील नरकटियागंज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार रश्मी वर्मा (Rashmi Verma) यांची राजीनाम्याची मागणी होती होती. त्यांनी रविवारी आमदारकीचा राजीनामा दिल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. पण प्रत्यक्षात त्यांनी लिहिलेले राजीनाम्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा राजीनाम्याची केवळ स्टंटबाजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वर्मा यांच्या या राजीनाम्यामुळे भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप समोर आलं नसलं तर त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. रश्मी वर्मा यांनी रविवारी विधानसभा अध्यक्षांना तीन ओळींचे पत्र लिहित राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. वैयक्तिक कारणास्तव आपल्या मर्जीने राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करावा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पत्रात त्यांनी कोणतंही ठोस कारण दिलेलं नाही. पण हे पत्र अध्यक्षांना दिलेच नसल्याचे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीच स्पष्ट केलं आहे.

BJP
कोरोनाबाधित रुग्णांसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली; जाणून घ्या सविस्तर

जयस्वाल म्हणाले, वर्मा यांचे काही कौटूंबिक वाद आहेत. त्यातून त्यांनी हा राजीनामा दिला आहे. पण विधानसभा अध्यक्षांकडे हे पत्र दिलेले नाही. त्यांच्या कुटूंबातील वादाशी पक्षाचा काही संबंध नाही. त्यामुळे त्या राजीनामा देणार नाहीत, असं जयस्वाल यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, वर्मा यांचा राजीनामा हातात घेतलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या पत्रावर 9 जानेवारी 2022 हीच तारीख आहे. काही कौटूंबिक वादातून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही आहे. संपत्तीच्या वादातून त्यांच्यासह समर्थकांविरोधात दावेही दाखल करण्यात आल्याचे समजते.

दुसरीकडे त्यांचे बंधू अनूप प्रसाद यांनी मागील वर्षी उत्तर प्रदेश टेट परिक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान त्यांनीच आपण वर्मा यांचे बंधू असल्याचे सांगितले होते. त्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच प्रकरणातून रश्मी वर्मा यांनी राजीनाम्याची दिल्याचीही चर्चा आहे.

बिहारमध्ये भाजप व संयुक्त जनता दल (JDU) सतेत आहे. वर्मा या 2014 मध्ये जदयूतून भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणूकही जिंकली. 2015 मध्ये भाजपने तिकीट न दिल्याने त्या अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या होत्या. त्यामुळे नरकटियागंज विधानसभेची निवडणूक (Assembly Election) तिरंगी झाली होती. या निवडणुकीत वर्मा यांचे दीर विनय वर्मा काँग्रेसचे (Congress) उमेदवार होते.

विनय वर्मा सुमारे 57 हजार मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर 2020 च्या निवडणुकीत भाजपने रश्मी यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. आता त्यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने भाजपला धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com