Bharat Jodo Yatra : "राहुल गांधींमध्ये बदल झाला आहे का?" म्हणाले...

Bharat Jodo Yatra : माझी इच्छा आहे की, देशातील एकही जवान शहीद होऊ नये.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींनी आजच्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना म्हंटले की, "भाजपच्या विरोधात अल्टरनेटीव्ह व्हिजन द्यावं लागेल. आज शिक्षणव्यवस्था काम करत नाही. आपण मुलांना जी कल्पना शक्ती देत आहोत, ते चुकीचं आहे. यात्रेदरम्यान मी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांशी बोललो. आपली शिक्षणव्यवस्था आपल्याला चार-पाचच गोष्टीच देऊ शकतं. सर्वच जण डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आयएएस नाही होऊ शकणार, नवीन शैक्षणिक धोरण योग्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
Abdul Sattar : माझ्याच पक्षातील नेते...; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात खळबळ

सीमेवरील परिस्थितीचा इतर देश फायदा घेत आहेत. सीमेवरील परिस्थिती सुधारली नाही, तर मोठा फटका बसू शकतो. कोव्हिड मध्ये ही अशीच परिस्थिती झाली, असेही राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रेत राहुल गांधीत बदल झाला आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, माझ्या मूळ विचारात काही बदल झालेला नाही. पण ते पहिल्यापेक्षा अधिकच मजबूत झाले आहेत.

समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि कॉंग्रेस हे एक होऊ शकत नाही, असं असतं तर भाजपने कधीच काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला नसता. मात्र विरोधी पक्षाला आदर देणं ही आमची भूमिका आहे. भाजपला हरवण्यासाठी एका राष्ट्रीय विचारधारेची गरज नाही. समाजवादी पक्षाला काही मर्यादा आहेत, समाजवादी पक्षाकडे राष्ट्रीय विचारधारा नाही.

भाजपवर नाराज असलेले खासदार वरून गांधी यांच्याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले. वरूण गांधी आमच्याकडे आले तर त्यांचं स्वागतच आहे. याबाबत काहीच दुमत नाही. मात्र याबद्दल आमचे पक्षाचे अध्यक्षच अंतिम निर्णय घेतील, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
Chandrashekhar Bawankule यांनी अजित दादांना पुन्हा डिवचले; म्हणाले, होय धर्मवीरच !

माझे वडील, माझी आजी देशासाठी शहीद झाले आहेत. मात्र ही गोष्ट भाजपला, त्यांच्या नेत्यांना समजू शकत नाही. माझी इच्छा आहे की, देशातील एकही जवान शहीद होऊ नये. जवानांचा राजकरणासाठी फायदा घेऊ नये. बॉर्डरवर उभा असणाऱ्या जवानांचा मी आदर करतो. आपल्या भारताच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परराष्ट्र धोरण व्यवस्थित सांभाळले जात नाही. सरकारने सेनेचं ऐकायला हवं. सीमेवर जे घडतंय ते जनतेपासून सरकारने लपवू नये. सेनेला राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवा, असे राहुल गांधी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com