Ashish Mishra : ४ शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात आशिष मिश्राला जामीन : मात्र 'या' अटी ही घातल्या!

Lakhimpur Kheri : आशिषला उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून बाहेर पडावे लागणार..
Lakhimpur Kheri : Ashish Mishra :
Lakhimpur Kheri : Ashish Mishra :Sarkarnama

Ashish Mishra : शेतकरी आंदोलना दरम्यान लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरण घडलं होतं. या प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra Bail) याला सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता आशिषला केवळ ८ आठवड्यांसाठी सोडण्यात येत आहे, असे न्यायालयाने म्हंटले आहे. परंतु जामीनातील अटींचे पालन न केल्यास, जामीन रद्द करण्यात येईल, सुटका झाल्याच्या एका आठवड्याभरातच आशिषला उत्तर प्रदेश आणि दिल्लीतून बाहेर पडावे लागणार आहे.

Lakhimpur Kheri : Ashish Mishra :
Eknath Shinde : सरकारमधील मंत्र्याचा दोन वेगवेगळ्या दाव्यांमुळे संभ्रमाचे वातावरण : मुख्यंमंत्री नेमके...

या प्रकरणी १४ मार्च रोजी पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात येईल, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. १४ मार्च रोजीआजच्या दिलेल्या आदेशाचाही आढावा घेण्यात येईल, असे न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने ४ शेतकऱ्यांचा हत्येचा आरोप असणाऱ्या आशिषला अंतरिम जामिनावर मुक्त करण्याचेआदेश देण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी या ठिकाणी शेतकरी आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांना वाहनाने चिरडल्याची घटना घडली होती. याबाबत आशिष यांना अटक झाली होती.

काय आहे पूर्ण प्रकरण -

मागील वर्षी 3 ऑक्टोबरच्या दिवशी, अजय मिश्रा यांच्या मालकीची थार हे वाहन व आणखी तीन एसयूव्ही वादनाचा ताफा लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेत चार शेतकरी आणि एक पत्रकार यांचा मृत्यू झाला होता. तर इतर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर हिंसाचार घडून आला. यामध्ये भाजपचे दोन नेते व थार वाहनाचा चालत ठार झाले होते. या प्रकरणात एसआयटीकडून आशिष मिश्रा यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली होती.

Lakhimpur Kheri : Ashish Mishra :
Daund Mass Murder Case : बदल्याच्या भावनेने सुडाने पेटलेल्या पाच भावंडांनी चुलत भावासह सात जणांना संपवले

३ जानेवारी रोजी एसआयटीने आशिष मिश्रा आणि त्यांचे काका वीरेंद्र शुक्ला यांच्यासह १३ जणांविरूध्द आरोपपत्र सादर केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून फेब्रुवारीमध्ये मिश्रा याला जामीन दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयातील तत्कालीन मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने एप्रिल २०२२ मध्ये उच्च न्यायालयाचा तो आदेश रद्दबातल ठरवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com