अरुंधती रॅाय यांच्या विधानामुळे वाद ; मोदींचे नाव न घेता टीका

''एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद (Narendra Modi) भूषविता आले पाहिजे. एकदा हे पद भूषविल्यानंतर या पदावर दुसऱ्या व्यक्तीला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे,''
Arundhati Roy ,Narendra Modi

Arundhati Roy ,Narendra Modi

sarkarnama

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॅाय (Arundhati Roy) यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्ष झाल्या निमित्त प्रेस क्लब ऑफ इंडिया तर्फे आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॅाय यांनी हे विधान केलं आहे.

अरुंधती रॅाय म्हणाल्या, ''एका व्यक्तीला एकदाच पंतप्रधानपद भूषविता आले पाहिजे. एकदा हे पद भूषविल्यानंतर या पदावर दुसऱ्या व्यक्तीला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे,'' तशी तरतूद करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

''शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कृषी कायदे मागे घ्यावे, त्याचप्रमाण मोदी सरकारला (Modi Government) एनआरसीचा कायदाही मागे द्यावा, लागेल,'' असे रॅाय म्हणाल्या. अरुंधती रॅाय यांनी हे विधान करतांना कुणाचेही नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.

''मोदी सरकारने दहशतवादाची व्याख्या बदलली आहे. सुधा भारव्दाज, आनंद तेलतुंबडे, गैातम नवलखा यांच्यासारख्या वुद्धीजीवी व्यक्तींना मोदींनी (Modi Government) दहशतवादी ठरविले. मोदीं सरकारनं यूएपीए या कायद्याचा दुरुपयोग करुन निरपराध व्यक्तींना अनेक महिन्याासून तुरुंगात पाठविले. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे,'' असे अरुंधती रॅाय म्हणाल्या.

<div class="paragraphs"><p>Arundhati Roy ,Narendra Modi</p></div>
मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार अन॒ भाजपचे माजी आमदार एकत्र

पंतप्रधान मोदींचे 'बालिका वधू'ने मानले आभार!

नवी दिल्ली : मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुलगी 21 वर्षाची झाल्याशिवाय कोणत्याही पालकांना तिचं लग्न लावून देता येणार नाही.

देशात बालविवाहाचा प्रश्न संपविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, सरकारी पातळीवर प्रयत्न करीत आहेत. पण तरीही देशाच्या काही भागात आजही बालविवाह होताना दिसत आहेत. बालविवाहाच्या प्रश्नावर सध्या सुरु असलेल्या बालिका वधू-२ मधील 'आनंदी'ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करुन त्यांचे आभार मानले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com