बालाकोट हल्ल्याच्या नियोजनाची माहिती तीन दिवस आधीच अर्णब गोस्वामींना होती!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
arnab goswami said something big will happen before balakot strike
arnab goswami said something big will happen before balakot strike

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. बालाकोटमधील हल्ल्यासह अतिशय महत्वाची माहिती गोस्वामींना आधीपासूनच असल्याचे यातून समोर आले आहे.  

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांना थेट आव्हान दिले होते. दरम्यान, अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन दिला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. या प्रकरणी अटक झालेले ते पंधरावे आरोपी आहेत. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहेत. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला आहे. 

गोस्वामींनी चॅटमध्ये काही तरी मोठे घडणार असल्याचा उल्लेख बालाकोट हल्ल्याच्या तीन दिवस आधी केला होता. हवाई दलाने बालाकोटमधील हल्ला 26 फेब्रुवारी 2019 रोजी केला होता. जैशे महंमदच्या दहशतवादी तळावर हा हल्ला करण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला होता. गोस्वामी यांनी मात्र, तीन दिवस आधी म्हणजेच 23 फेब्रुवारी 2019 रोजी काही तरी मोठे घडणार असल्याचे दासगुप्ता यांना सांगितले होते. 

गोस्वामींनी काही तरी मोठे घडणार असे सांगितल्यानंतर दासगुप्ता यांना दाऊदचा उल्लेख केला होता. त्यावर गोस्वामींनी नाही पाकिस्तानबाबत काही तरी मोठे घडेल, असे सांगितले होते. 'बिग मॅन'ला यंदा यातून फायदा होईल आणि तो अतिशय सहजपणे निवडणुका जिंकेल, असेही उत्तर दासगुप्ता यांनी दिले होते. सामान्य हल्ल्यापेक्षा हा हल्ला वेगळा आणि मोठा असेल, असा दावाही गोस्वामींनी केला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com