जामीन मिळाला तरी मंत्रिपुत्र दोन गंभीर कलमांमध्ये अडकला अन्...

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Ashish Mishra
Ashish MishraFile Photo

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण जामीन मिळाला असला तरी तो लगेच तुरूंगाबाहेर येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने गुरूवारी मिश्रा याला जामीन मंजूर केला. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आशिषला 9 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर चार महिन्यांनी तो बाहेर येणार आहे. पण दोन कलमांनी तुरूंगाबाहेर पडण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. न्यायालयाने जामीन देताना आदेशात कलम 302 आणि 120 ब चा उल्लेख केला नाही.

Ashish Mishra
हिजाबच्या वादात मुख्यमंत्र्यांच्या मुलीची उडी; कविता लिहिली अन् म्हटलं...

आशिष मिश्राविरूध्द आयपीसी कलम 147, 148, 149, 302, 307, 326, 34, 427 आणि 120 बी या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आर्म्स अॅक्टमधील 3/25, 5/27 आणि 39 कलमांअंतर्गतही आरोपी बनवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने जामीनाच्या आदेशात कलम 302 व 120 ब चा उल्लेख केलेला नाही. इतर सर्व कलमांचा त्यात उल्लेख आहे. कलम 302 हे हत्या आणि 120 ब हे षडयंत्र रचण्याबाबतचे आहे.

या दोन गंभीर गुन्ह्यांच्या कलमांचा जामीन आदेशात उल्लेख नसल्याने आशिष मिश्रा लगेच तुरूंगातून बाहेर येऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या वकिलांनी सांगितले की, जामीन आदेशामध्ये ही दोन कलमे घालण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करणार आहे. आदेश दुरूस्ती झाल्यानंतर मिश्रा यांना जामीन मिळेल, असेही वकिलांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता मिश्रा यांना बाहेर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक झाली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात वर्षभराहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करीत होते. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील 4 शेतकरी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com