ऑस्ट्रेलियातून एअर इंडियाचे विमान एकही प्रवासी न घेता परतले

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून, जगभरातील अनेक देशांना भारतीयांसाठी प्रवासबंदी केली आहे.
air india plane from australia returned to delhi without any passengers
air india plane from australia returned to delhi without any passengers

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाने भारताच्या विमानांना आजपासून बंदी केली आहे. परंतु, ही बंदी करण्याआधी तिथेच असलेले एअर इंडियाचे एक विमान एकही प्रवासी न घेता भारतात परत पाठवण्यात आले आहे. या विमानातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने हा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्याला तेथेच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

ऑस्ट्रेलियाने भारतीय विमानांवर आजपासून 15 मेपर्यंत बंदी घातली आहे. एअर इंडियाचे विमान शनिवारी (ता.24)  सिडनीला गेले होते. विमानातील सर्व कर्मचाऱ्यांची आधी भारतात चाचणी करण्यात आली होती. तेव्हा हे सर्व कर्मचारी निगेटिव्ह सापडले होते. हे विमान रविवारी (ता.25) सकाळी सिडनीला पोचले. 

विमान सिडनीला पोचल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांची पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल सोमवारी (ता.26) मिळाला. यात विमानातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या विमानाला प्रवासी घेऊन जाण्यास मनाई केली. अखेर हे विमान केवळ माल घेऊन आज सकाळी दिल्लीला परतले. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याला सिडनीतच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

देशात 24 तासांत 3 लाख 23 हजार रूग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 23 हजार 144 रुग्ण सापडले असून, 2 हजार 771 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 97 हजार 894 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाख 82 हजार 204 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.34 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.54 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 45 लाख 56 हजार 209 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com