विरोधकांना धक्का : वीस माजी मंत्री, खासदार, आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

भाजपने आता फोडाफोडीचे राजकारण सुरू केलं आहे.
BJP

BJP

Sarkarnama

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजपने ((BJP) फोडाफोडीचे राजकारण सुरू केलं आहे. पंजाबमध्ये (Punjab) पुढील आठवडाभरात एक-दोन नव्हे तर 15 ते 20 माजी कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार, सेलिब्रिटी भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात केवळ तीनच आमदार असलेल्या भाजपची ताकद यामुळे वाढणार आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेशाकडे विरोधकांचंही लक्ष्य लागलं आहे.

'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेससह (Congress) आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल (SAD) व राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमधील हे सर्व नेते आहेत. त्यामध्ये चार प्रसिध्द गायकांचाही समावेश आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder singh) स्वतंत्र चूल मांडत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांची आघाडी पंजाबमध्ये काँग्रेस व अकाली दलाला टक्कर देणार आहे.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
मोठी बातमी : वानखेडे प्रकरणातून शाहरुखची माघार? मुंबई पोलिसांचा तपासाला ब्रेक

अमरिंदरसिंग यांचे अनेक समर्थक काही माजी मंत्री व विद्यमान आमदारांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमरिंदरसिंग काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपमधील सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवडाभरात पक्ष प्रवेश होणार आहेत. अनेक जण भाजपमध्ये येणार असल्याने टप्प्याटप्याने हे प्रवेश होणार आहेत. दहशतवाद ड्रग्ज आदी मुद्यांवरून पंजाबमध्ये रोष आहे. त्यामुळे लोक आता भाजपकडे आशेने पाहत आहेत.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
बारा आमदारांचा 'गेम' करण्यासाठी काँग्रेसनं खेळली ही चाल...

अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजपविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पण आता कायदे मागे घेण्यात आल्याने तसेच अमरिंदरसिंग भाजपसोबत गेल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसमध्ये नवज्योतसिंग सिध्दू यांच्याविषयी काही गट नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेससाठी कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहूमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीकडून सत्ता काबीज केली होती. हे दोन पक्ष सलग दहा वर्षे सत्तेत होते. या निवडणुकीत आप 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com