योगानंद शास्त्रींच्या प्रवेशानंतर पवार म्हणाले, देशात भाजपाला पर्याय उभा करण्याचे प्रयत्न

आम्ही याच दिशेने प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला यश नक्की मिळेल.
Yoganand Shastri Joins NCP
Yoganand Shastri Joins NCPsarkarnama

दिल्ली : देशात भाजपला सक्षम पर्याय उभा करण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. सामान्यांना भाजपाला पर्याय हवा आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस त्या मार्गाने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कधीकाळचे दिल्ली काँग्रेसचे दिग्गज नेते योगानंद शास्त्री (Yoganand Shastri) यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शास्त्री यांच्या पक्षप्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, "देशातल्या काही राज्यांमध्ये आगामी काळात निवडणूका आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला सांप्रदायिक शक्तीला बाजूला सारण्यासाठी जो पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे, तो पर्याय मिळवून देण्याची आमची जबाबदारी आहे. त्या दिशेने आम्ही तयारी करत आहोत. आज त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण आम्ही याच दिशेने प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला यश नक्की मिळेल.

Yoganand Shastri Joins NCP
शरद पवार म्हणतात आमचं ठरलंय! आता भाजपने दिवस मोजावेत

देशवासियांना भाजपच्या हुकूमशाहीमुळे पुढे येणाऱ्या सांप्रदायिक शक्तींमुळे देशातली शांतता भंग होत आहे. त्यामुळे लोकांना आता पर्याय हवा आहे. आणि तो देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. यासाठी आधी आम्हाला आमचा पाया मजबूत करायला हवा. मला आनंद आहे की शास्त्रीजींनी दिल्लीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली".

Yoganand Shastri Joins NCP
दिल्लीत राष्ट्रवादीची ताकद वाढली; योगानंद शास्त्रींचा पक्षप्रवेश

आमचे घरही आम्हाला मजबूत करायचं आहे

दिल्लीत राष्ट्रवादीला कष्ट करण्याची गरज आहे. देशाच्या राजधानीत राष्ट्रीय पक्षाचे काम विशिष्ट पद्धतीने झाले पाहिजे. त्यामुळे समविचारी लोकांना बरोबर घेत आहे. पण याबरोबर आमचे घरही आम्हाला मजबूत करावे लागेल. गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. दिल्लीतील जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी सूचना त्यांना केली होती, त्यांचा त्यांनी स्वीकार केला. त्यांचे कार्यकर्तेही पक्षात आले आहेत.

इंदिरा गांधीविरोधात पर्याय उभा राहिला, मोदींविरोधातही राहिल

दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बोलताना पवार म्हणाले होते, केंद्रात विरोधकांमध्ये सक्षम पर्याय नाही का? या प्रश्नावर उत्तर दिले होते. कोणत्या नेत्याला पर्याय नाही, अशी स्थिती लोकशाहीत असूच शकत नाही. पर्याय उपलब्ध असतो. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा लोक त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहतात. आताही देश चालवण्याची क्षमता असलेले विरोधकांमध्ये अनेक लोक आहेत. आपल्याला त्याची अजिबात चिंता वाटत नाही. लोकच पर्याय देतील.

१९७५ ते १०७७ या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींविरोधातही देशात सक्षम नेता कोणी नव्हता. पण निवडणुका पार पडल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्याआधी त्यांनी नेतृत्व करावे, असा विचारही कोणाच्या डोक्यात नव्हता. मात्र जयप्रकाश नारायण यांनी आवाहन केले आणि संपुर्ण देश त्यांच्या मागे उभा राहिला. तेव्हा कोणी एक व्यक्ती नव्हती, अनेक लोक होते. शेवटी जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा लोकांमधून व्यक्ती पुढे येते किंवा लोक स्वत:च त्या व्यक्तीला पुढे करतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com