महापालिकांसह नगरपालिका निवडणुकांत भाजपचा धुव्वा; बड्या नेत्यांची उडणार दांडी

राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला (BJP) महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांत मोठा धक्का बसला आहे.
BJP
BJPSarkarnama

कोलकता : राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला (BJP) महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांत मोठा धक्का बसला आहे. राज्यातील 108 महापालिका आणि नगरपालिकांपैकी एकाही ठिकाणी भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नाही. पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उद्या चिंतन बैठक बोलावली आहे. याचबरोबर पक्षात मोठे फेरबदल होऊन काही बड्या नेत्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपची चिंतन बैठक 5 मार्चला बोलावण्यात आली आहे. आत्मपरीक्षण करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली असून, यात महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांतील पक्षाच्या खराब कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे. या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात आले आहे. मागील काही निवडणुकांपासून पक्षाची कामगिरी खालावताना दिसत आहे. याची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली आहे. यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत कानपिचक्या दिल्या जाऊ शकतात. याचबरोबर कार्यकारिणीत फेरबदलाच्या चर्चेने जोर पकडला आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

BJP
गड आला पण सिंह गेला! महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली पण आपल्याच वॉर्डात 5 मतांनी हरला

राज्यातील 108 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांपैकी (Civic Polls) 102 ठिकाणी तृणमूल काँग्रेसने (TMC) विजय मिळवला आहे. डाव्यांना केवळ एका ठिकाणी विजय मिळाला असून, भाजप आणि काँग्रेसला (Congress) खातेही खोलता आलेले नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासमोर सगळे विरोधी पक्ष हतबल झाले आहेत. डाव्या पक्षांनी एकमेव विजय मिळवला असून, ताहेरपूर महापालिकेत त्यांनी विजय मिळवला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत 77 जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. परंतु, भाजपला आता एकाही ठिकाणी सत्ता मिळवता आलेली नाही. काँग्रेसचीही

BJP
युद्धाची दाहकता! एकाच आठवड्यात युक्रेनमधून तब्बल 10 लाख नागरिकांचे पलायन

ममता बॅनर्जींच्या करिष्म्यासमोर सगळेच विरोधी पक्ष नाकाम ठरले आहे. तृणमलूने 102 ठिकाणी विजय मिळवला असून, 31 ठिकाणी विरोधकांना खातेही खोलता आलेले नाही. यामुळे पुन्हा एकदा ममतांनी बंगालवर निर्विवाद आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत एकूण 2 हजार 171 जागा आहेत. त्यातील तब्बल 1 हजार 870 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजपला 63 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला 59 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 55 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि काँग्रेस एकाही महापालिका अथवा नगरपालिकेत सत्ता मिळवता आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com