ममता बॅनर्जींचा विरोधकांच्या एकजूटसाठी प्रयत्न; मात्र काँग्रेसनंतर डाव्यांचाही 'सुरुंग'

Mamata Banerjee | : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या प्रयत्तांना विरोधकांचा ठेंगा
Mamata Banerjee
Mamata Banerjeesarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह (BJP) आता विरोधक देखील कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee यांनी १५ जून रोजी देशातील तमाम विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत एक संयुक्त बैठक बोलावली आहे. मात्र ममता बॅनर्जींंच्या या प्रयत्नांना काँग्रेसपाठोपाठ (Congress) आता डाव्या पक्षांनी देखील सुरुंग लावला आहे.

देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे. विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार उभा करून आपली एकजूट दाखविण्यासाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या निवडणुकीची रणनिती करण्याच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. याशिवाय विरोधी ऐक्याचा संदेश देण्यासाठी प्रसंगी आपला उमेदवार न देता सहमतीच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचीही तयारी दर्शवली. (President election latest news)

मात्र सोनिया गांधी यांची ही रणनिती सुरु असतानाच ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना परस्पर पत्र पाठविणे आणि १५ जूनला दिल्लीत बैठक बोलावणे हे विरोधी पक्षांना, विशेषतः काँग्रेसला त्याचप्रमाणे डाव्या पक्षांनाही रुचलेले दिसत नाही. ही बैठक म्हणजे सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेस नव्हे तर तृणमूल काँग्रेसच सक्षम पर्याय असल्याचे दर्शविणारी असल्याचा सूर काँग्रेसच्या गोटात आहे.

परंतु, काँग्रेसने यावर थेट भाष्य करण्याचे टाळले आहे. मात्र सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवाराबाबत अन्य पक्षांशी विचारविनिमय करण्याची जबाबदारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना सोपवून ममता बॅनर्जांना योग्य तो संदेश दिला आहे. (President election latest news)

तर, ममता बॅनर्जींची ही बैठक एकतर्फी आणि कोणाशीही सल्लामसलत न करता बोलावली आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे. शिवाय अशा प्रकारचे एकांगी निर्णय विरोधकांच्या ऐक्याला हानी पोहोचविणारे असतील, असेही त्यांनी फटकारले. तर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनीही एकतर्फी बैठक बोलावण्याचा प्रकार संभ्रम वाढविणारा ठरू शकतो, अशा शब्दात ममता बॅनर्जींना टोलावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com