सरन्यायाधीशांनी झापताच पोलिसांनी थेट अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरच छापले

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
CJI N. V. Ramana
CJI N. V. Ramana File Photo

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यासह 13 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केल्याने आता उत्तर प्रदेश पोलीस खडबडून जागे झाले आहेत.

या प्रकरणाची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याच्या मागणीच्या याचिकेवर 26 ऑक्टोबरला सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. या वेळी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने हरीश साळवे यांनी बाजू मांडली. 30 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले असून त्यापैकी 23 घटनेच्या ठिकाणी होते, असे त्यांनी सांगितले होते. त्यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती.

शेतकरी मोर्चामध्ये हजारो शेतकरी असताना त्यात केवळ 23 साक्षीदार कसे मिळाले, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. त्याठिकाणी चार ते पाच हजार लोक होते. ते स्थानिक होते. घटनेनंतरही मोठ्या संख्येने लोक होते, जे चौकशीची मागणी करत होते, असे न्यायालयाने म्हटले होते. यामुळे उत्तर प्रदेश पोलीस खडबडून जागे झाले आहेत. या प्रकरणी साक्षीदार गोळा करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. पोलिसांनी अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांकच आता वृत्तपत्रात प्रसिद्ध केले आहेत.

CJI N. V. Ramana
माजी मुख्यमंत्री म्हणाले, अजून दहा दिवसच काँग्रेसमध्ये राहणार!

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, नागरिकांना आवाहन करण्यात येते की घटनेचे साक्षीदार असल्यास त्यांनी पुढे यावे. त्यांना साक्ष नोंदवायची असल्यास लखीमपूर खीरीच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. याचबरोबर या घटनेचा डिजिटल पुरावा असल्यासही ते पोलिसांसमोर सादर करू शकतात. अशा व्यक्तींची ओळख गुप्त ठेवण्यात येईल आणि त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात येईल.

CJI N. V. Ramana
एनसीबीचं पथक मुंबईत; प्रभाकर साईल अन् वानखेडेंची होणार चौकशी

या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. त्यातील तिघांना 23 ऑक्टोबरला अटक करण्यात आली असून, यात मोहित त्रिवेदी, रांकू राणा आणि धर्मेंद्र यांचा समावेश आहे. या तिघांची नावे आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून समोर आली होती. या प्रकरणी सुरवातीला आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे आणि लवकुश राणा या दहा जणांना अटक झाली आहे. आशिष पांडे आणि लवकुश राणा हे दोघे वगळता इतर सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com