भाजप जिंकताच लखीमपूर खीरीतील साक्षीदारावर हल्ला; सरन्याधीशांनी घेतली गंभीर दखल

सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणी सुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे.
Lakhimpur Kheri
Lakhimpur KheriSarkarnama

लखीमपूर खीरी : नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून पुन्हा सत्ता काबीज केली आहे. भाजपच्या विजयाचा जोरदार जल्लोष सुरू असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खीरीत शेतकऱ्यांना चिरडले होते. आता या प्रकरणातील साक्षीदारांना धमक्या दिल्याचे समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयात याची माहिती देण्यात आली आहे. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणी उद्याच सुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याची आठवड्यात जामिनावर सुटका झाली होती. यानंतर तो पुन्हा अडचणीत आला आहे. आशिषने उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना चिरडले होते. त्याच्या विरोधात आता मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने विधिज्ञ प्रशांत भूषण हे मैदानात उतरले आहेत.

या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर हल्ला करण्यात आला आहे. भाजप पुन्हा सत्तेत आला असून, तुम्हाला बघून घेऊ, अशा धमक्या हल्लेखोरांनी दिल्या आहेत. राज्यात भाजपचा पुन्हा विजय झाल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असा दावा भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. आशिष मिश्राला जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणातील इतर आरोपीही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेत आहेत, हेही भूषण यांनी निदर्शनास आणून दिले. यावर सरन्यायाधीशांनी या प्रकरणी सुनावणीसाठी खंडपीठाची नियुक्ती करण्याचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी सांगितले आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.

Lakhimpur Kheri
दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं! नाना पटोलेंचा खोचक सल्ला

आशिषला उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारीला जामीन मंजूर केला होता. याला आता लखीमपूर खीरीतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश याचिका कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही. उत्तर प्रदेश सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते. राज्य सरकारने हे पाऊल न उचलल्यामुळे आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागत आहे.

Lakhimpur Kheri
पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार! काँग्रेसच्या मंत्री, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी 13 जणांना अटक झाली होती. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com