अमित शहांचा फोन येताच दोन मुख्यमंत्र्यांनी शत्रुत्व विसरून घातला गळ्यात गळा!

आसाम व मिझोराम सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता. यामुळे दोन्ही राज्यांतील चिघळलेला वाद आता शांत होऊ लागला आहे.
after amit shah call assam and mizoram cm ready for dialogue
after amit shah call assam and mizoram cm ready for dialogue

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या  हिंसाचार प्रकरणी आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याविरोधात दाखल केलेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घेण्याची घोषणा मिझोरामचे (Mizoram) मुख्यमंत्री झोरामथांगा (Zormathanga) यांनी केली आहे. सरमा आणि झोरामथांगा यांनी शांततामय मार्गाने वाद सोडवण्याची तयारी दर्शवली आहे. यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची शिष्टाई असल्याचे समोर आले आहे. 

आसाम-मिझोराम सीमेवरील संघर्षानंतर दोन्ही राज्ये एकमेकांना आव्हान देत होती. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीही आक्रमक भूमिका घेत संघर्षाच्या तयारीत होते. यामुळे अखेर अमित शहांनी सरमा आणि झोरामथांगा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आसाममध्ये भाजपची सत्ता असून, मिझोराममध्येही भाजपचीच सत्ता आहे. मिझोराममध्ये भाजपचा सहकारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंट सत्तेवर आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचीच सत्ता असताना अशा प्रकारे संघर्ष होणे केंद्रीय नेतृत्वाला परवडणारे नव्हते. 

अखेर अमित शहांनी सरमा आणि झोरामथांगा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर शांततामय मार्गाने चर्चेतून तोडगा काढावा, असे निर्देश त्यांनी दिली. प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांची कान उघाडणी केली. यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे चर्चेची भूमिका घेत मैत्रीचा हात पुढे केला. आता दोन्ही मुख्यमंत्री शांततामय मार्गाने चर्चेने प्रश्न सोडवू, असे म्हणत आहेत. 

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या विरोधात दाखल केलेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घेण्यात येईल, असे मिझोराम सरकारने म्हटले आहे. याचबरोबर मिझोरामचे खासदार भाजपच्या सहकारी पक्षाचे मिझोराममधील खासदार के.वानलालवेना (K. Vanlalvena) यांच्याविरोधात दाखल गुन्हा मागे घेण्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली आहे. यामुळे दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्ध संपले असून, दोन्ही राज्यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. 

आसाम-मिझोराम सीमेवरील स्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालय नजर ठेवून आहे. सीआरपीएफच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यांतील पोलिसांत संघर्ष होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यांना शांतता कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पुन्हा सीमेवर तणाव निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 

गृहमंत्री अमित शहा नुकतेच ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील काचर, हेलकांडी आणि करीमगंज या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com