काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे.
Adhir Ranjan Chowdhury
Adhir Ranjan Chowdhury Sarkarnama

कोलकता : काँग्रेस (Congress) नेते अधीररंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील बेहरामपूर महानगरपालिकेत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या महापालिकेत तृणमूल काँग्रेसने (TMC) विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 108 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांपैकी (Civic Polls) 102 ठिकाणी तृणमूलने विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिला आहे.

बेहरामपूर महापालिकेची ओळख अधीरगड अशी आहे. आता हा गडच तृणमूलने नेस्तनाबूत केला आहे. या महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. मागील वेळी काँग्रेसला 26 जागा मिळाल्या होत्या तर तृणमूलला केवळ दोन जागा होत्या. आता तृणमूलने 22 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला केवळ 6 जागा मिळाल्या आहेत. बेहरामपूरमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्याने अधीररंजन चौधरींना मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे.

अधीररंजन चौधरी हे काँग्रेसचे लोकसभेतील नेते आहेत. ते बेहरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. चौधरी हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून, त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का बसल्याने त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चौधरी यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने राज्यात विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. यात काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. आता बेहरामपूरमधील पराभवाने पक्षांतर्गत विरोधकांनी चौधरी यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Adhir Ranjan Chowdhury
बाबा राम रहीमनं तुरुंगात पाऊल टाकताच 24 तासांत ठरला पुन्हा सुटण्याचा मुहूर्त?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलने या निवडणुकांत मोठा विजय मिळवला आहे . डाव्यांना केवळ एका ठिकाणी विजय मिळाला असून, भाजप आणि काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. डाव्या पक्षांनी एकमेव विजय मिळवला असून, ताहेरपूर महापालिकेत त्यांनी विजय मिळवला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत 77 जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. परंतु, भाजपला (BJP) आता एकाही ठिकाणी सत्ता मिळवता आलेली नाही. काँग्रेसचीही (Congress) तीच अवस्था आहे. ममता बॅनर्जींच्या करिष्म्यासमोर सगळेच विरोधी पक्ष नाकाम ठरले आहे. तृणमलूने 102 ठिकाणी विजय मिळवला असून, 31 ठिकाणी विरोधकांना खातेही खोलता आलेले नाही. यामुळे पुन्हा एकदा ममतांनी बंगालवर निर्विवाद आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे.

Adhir Ranjan Chowdhury
ममतांच्या लाटेसमोर सगळेच हतबल! भाजप, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही

या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत एकूण 2 हजार 171 जागा आहेत. त्यातील तब्बल 994 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. याचबरोबर तृणमूलने 456 जागांवर आघाडी घेतली आहे. याचवेळी अपक्षांनी 83 जागा मिळवल्या आहेत. भाजपला 46 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला 32 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 20 जागा मिळाल्या आहेत. भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस हे एकाही महापालिका अथवा नगरपालिकेत आघाडीवर नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com