Congress:कपिल सिब्बलांना घरचा आहेर ; मंत्री होते तेव्हा कॉग्रेस चांगली अन् आता..

वातानुकुलीत खोलीत बसून इतरांना सल्ला देण्यात काय अर्थ,'' असा टोमणा अधीर रंजन चैाधरी यांनी हाणला.
Kapil Sibal, Adhir Ranjan Chowdhury
Kapil Sibal, Adhir Ranjan Chowdhurysarkarnama

नवी दिल्ली : कॉग्रेसमधील अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाही. जी-२३मधील नेते, माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल (Congress Leader Kapil Sibal)यांच्यावर कॉग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी लोकसभेत हल्लाबोल केला. त्यामुळे कॉग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ''गांधी परिवाराने नेतृत्व सोडावे,'' असा सल्ला कपिल सिब्बल यांनी दिल्यानंतर ते सध्या कॉग्रेसच्याच निशाण्यावर आहे. त्याचे पडसाद आज लोकसभेत उमटले.

लोकसभेत आज कॉग्रेसचे नेता अधीर रंजन चैाधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीकास्त्र सोडले. चैाधरी म्हणाले, ''कपिल सिब्बल कुणाचे नेते आहेत, मला माहित नाही. पण कॉग्रेसमुळे त्यांची राजकीय जीवनात खूप प्रगती झाली आहे. ते जेव्हा युपीए सरकारमध्ये केंद्रीयमंत्री होते तेव्हा त्यांच्याबाबत सारे काही आलबेल होते. आता कॉग्रेस सत्तेत नसल्याने त्यांना वाईट वाटत आहे.

''कॉग्रेसमधील नाराज नेत्यांना (G-23) सत्तेच्या बाहेर राहण्याची सवय नाही. त्यामुळे ते स्वतःला वाचविण्यासाठी नेहमी टीका करीत असतात. त्यांच्यामागे कोण आहे, हे मला माहित नाही, कॉग्रेसचा पाठिंबा न घेता काय ते काय करु शकतात, याचे त्यांनी उदाहरण द्यावे. वातानुकुलीत खोलीत बसून इतरांना सल्ला देण्यात काय अर्थ,'' असा टोमणा अधीर रंजन चैाधरी यांनी हाणला.

गांधी परिवाराच्या नेतृत्वावर सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कपिल सिब्बल एक चांगले वकील असू शकतील, पण ते कॉग्रेस पक्षाचे चांगले नेता नाहीत, कॉग्रेसचा प्रचार करण्यासाठी ते कधीही कुठल्याही गावी गेले नाही. ते पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोनिया गांधी आणि कॉग्रेसला कोणीही कमकुवत करु शकत नाही. ''गांधी परिवाराने नेतृत्वापासून दूर जाऊन अन्य नेत्यांना संधी दिली पाहिजे,'' असे कपिल सिब्बल यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटलं आहे. यावरुन कॉग्रेसमध्ये अंतगर्त संघर्ष पेटला आहे.

Kapil Sibal, Adhir Ranjan Chowdhury
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोदींचा व्हिडिओ व्हायरल ; फडणवीसजी, उत्तर द्याल का?

''पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत,'' असे सोनिया गांधी यांनी नुकतेच म्हटलं आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यास नकार दिला आहे. ''काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील पावले उचलतील. आम्हाला सर्वांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे,'' असं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. चिंतन शिबिरात पराभवावर चर्चा झाल्यावरच याबाबत निर्णय होणार असल्याचे पक्षाकडून ठरविण्यात आले.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ''काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसचे नेतृत्व करतील आणि भविष्यातही असाच निर्णय घेतील. आपल्या सर्वांचा त्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे,'' सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, सीडब्ल्यूसीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर एकमताने विश्वास व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com