जगनमोहन यांनी अर्धे मंत्रिमंडळ बसवलं घरी; चौदा नवीन चेहऱ्यांना बनवलं मंत्री

नव्या मंत्रिमंडळात 14 नवीन चेहऱ्यांनी संधी दिली आहे. तसेच खात्यांमध्येही अनेक फेरबदल करण्यात आले असून सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडला.
CM Jagan Mohan Reddy
CM Jagan Mohan ReddySarkarnama

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी अर्ध मंत्रिमंडळ (Cabinet) घरी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या मंत्रिमंडळात 14 नवीन चेहऱ्यांनी संधी दिली आहे. तसेच खात्यांमध्येही अनेक फेरबदल करण्यात आले असून सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडला. दरम्यान, मंत्रिमंडळ फेरबदलात संधी न मिळालेल्या आमदारांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी मुख्यमंत्र्याविरोधात आंदोलन केले.

विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) जगनमोहन यांनी दिलेला शब्द करून दाखवला आहे. मंत्रिमंडळात नेत्यांचा समावेश करताना त्यांनी हे मंत्रिमंडळ दोन ते अडीच वर्षांचेच असेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर इतर आमदारांना संधी दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार मागील आठवड्यात गुरूवारी त्यांनी सर्व मंत्र्याचे राजीनामे घेतले. आज नव्या मंत्रिमंडळातील 25 मंत्र्यांचा शपथविधी झाला.

CM Jagan Mohan Reddy
शशिकला यांना उच्च न्यायालयाचा झटका; पक्षात परतण्याच्या प्रयत्नांना खीळ

जुन्या मंत्रिमंडळातील 11 जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केल्याची चर्चा आहे. मागासवर्गीय समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. त्यानुसार 25 जणांमध्ये 16 मंत्री हे अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक आणि इतर मागासवर्ग समाजातील आहेत. आधीच्या मंत्रिमंडळात 56 टक्के मंत्री मागासवर्गीय होते. आता ही टक्केवारी 68 वर पोहचली आहे.

मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाया पडले

मागील मंत्रिमंडळात तीन महिला मंत्री होत्या. आता त्यामध्ये एकने भर पडली आहे. त्यामध्ये अभिनेत्री रोजा यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह व्ही. राजिनी आणि उषा श्रीचरण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री जगनमोहन यांचे पाय धरले. तसेच गुडीवडा अमरनाथ आणि जोगी रमेश यांनीही मुख्यमंत्र्यांसमोर गुडघे टेकवून नमस्कार केला.

मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तयारी

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेड्डी यांच्याकडून संपूर्ण मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा काही दिवस सुरू होती. मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या नेत्यांना पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी वापर केला जाणार आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील फेरबदल केले आहेत. त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार करून आमदारांना संधी दिली जाणार आहे. पक्षाला मागील निवडणुकीत 175 पैकी 151 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळाली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाला मोठा विजय मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com