फडणवीस व अजित पवार यांचा निर्णय राज्याला स्थैर्य देणारा : राहुल कुल

'विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याच पक्षाने नितीमत्ता पाळली नाही. त्यांनी भाजपला नितीमत्ता शिकवू नये. सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल. भाजपचे सरकार स्थापन झाले ही मोठी समाधानाची बाब आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजुने कौल दिलेला आहे. मात्र, शिवसेना चुकीच्या मार्गाने गेल्याने राजकीय पेच निर्माण झाला. - राहुल कुल
Daund BJP MLA Rahul Kul Welcomes Ajit Pawar Decission
Daund BJP MLA Rahul Kul Welcomes Ajit Pawar Decission

केडगाव : राज्यात महायुतीच्या बाजुने जनादेश असताना विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली. अशा अवस्थेत असताना राज्याला स्थिर सरकार देण्याची गरज होती. एकूणच गोंधळाच्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राज्याला स्थैर्य देणारा व राज्याच्या हिताचा आहे. असे मत भाजपचे दौंडमधील आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे.

आमदार राहुल कुल हे भाजपचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर कुल सकाळशी बोलत होते. ते म्हणाले, ''विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणत्याच पक्षाने नितीमत्ता पाळली नाही. त्यांनी भाजपला नितीमत्ता शिकवू नये. सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल. भाजपचे सरकार स्थापन झाले ही मोठी समाधानाची बाब आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजुने कौल दिलेला आहे. मात्र, शिवसेना चुकीच्या मार्गाने गेल्याने राजकीय पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केले. त्यांचा हा निर्णय राज्याला विकासाच्या दिशेने नेणारा आहे.''

कुल पुढे म्हणाले, "भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात चांगले काम केले आहे. आगामी पाच वर्षात चांगले काम होण्यासाठी राज्यात भाजपचे सरकार स्थापन होणे गरजेचे होते. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर त्याचा राज्याच्या विकासावर मोठा परिणाम होतो. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासन पूर्ण करणे आता शक्य होणार आहे.'' राज्यात सरकार स्थापन होणे महत्वाचे होते. सरकार स्थापन झालेले आहे. माझ्या मंत्रीपदाबाबत मी आग्रही नाही. मंत्रीपद नसतानाही विकासकामात निधी कमी पडला नाही. सरकार स्थापन झाले हीच मोठी समाधानाची बाब आहे, असे कुल यांनी स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com