ही निवडणूक तालुक्‍याचे भवितव्य घडवणारी - दत्ता गोर्डे

ही निवडणूक तालुक्‍याचे भवितव्य घडवणारी - दत्ता गोर्डे

पैठण : विधानसभेची ही निवडणूक तालुक्‍याचे भवितव्य घडविणारी आहे. आतापर्यंत जनतेने चुकीचा माणुस निवडल्यामुळेच जनतेला हाल सोसावे लागले. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांवर दबाब आणायचा, अमिष दाखवायचे ही विरोधकांनी रणनिती अवलंबली आहे, पण कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका, कारण तालुक्‍याचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असल्याचे राष्ट्रवादी - कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी सांगितले. 

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दत्ता गोर्डे यांनी ग्रामीण आणि शहरी भागात फिरून मतदारांना आवाहन केले. ते म्हणाले, पैठण तालुक्‍याचा खुंटलेला विकास पुन्हा गतिमान करण्यासाठी ही निवडणुक महत्त्वाची आहे. त्यामुळे परिवर्तनाच्या लढाईत मतदारांची साथ हवी आहे. कोणतीही संस्था व आर्थिक बळ नसतांना शहर व तालुक्‍यात जनतेच्या पाठिंब्यावर राजकारण करीत असल्यामुळे टिकून आहे. 

सत्ताधारी नेत्यांना जनतेचे डोळ्यातील अश्रु कधी दिसले नाही, कारण त्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. जनतेचे प्रश्न विरोधकांनी पायाखाली तुडवले असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस महाआघाडीचे परिस्थिती चांगली असुन महा आघाडीचेच सरकार सत्तेवर येणार आहे. कारखाने, उद्योग धंदे बंद करुन बेरोजगारी निर्माण करणाऱ्या भाजप शिवसेना सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम युवकांना करावे लागेल. विरोधक आणखी एकदा संधी देण्याची भाषा करीत आहेत, पण आता त्यांना कायमचे घरी बसवा असे आवाहन देखील दत्ता गोर्डे यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com