करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील आदिनाथ आणि मकाई या दोन्ही साखर कारखान्यांतील कामगारांच्या पगार व इतर देणी वसुलीसाठी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानासमोर 12 मार्चपासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी दिली.
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखाने बागल गटाच्या ताब्यात आहेत. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार, वाहन वाहतूक मालकांची बिले, शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे, वाहन मालकांच्या वाहनांवर काढलेले बॅंकेचे कर्ज, कामगारांच्या शेतीवर काढलेले कर्ज आदी दोन्ही कारखान्यांच्या व्यवस्थापनाने वापरलेले आहे, असा आरोप श्री. कांबळे यांनी केला आहे.
यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे की, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा 46 महिन्यांचा तर "मकाई'चा 30 महिन्यांचा पगार थकला आहे. दोन्ही कारखान्यांच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांच्या आदेशानुसार दोन्हीही कारखान्यांचा कारभार गेली 10 वर्षे बागल कुटुंबाकडे असून कामगारांचे प्रपंच उद्ध्वस्त होण्याला रश्मी बागल-कोलते व बागल कुटुंबच जबाबदार आहे. म्हणून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून आंदोलने सुरू आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.