कोणताही पक्ष युती तोडून सरकार स्थापन करणार नाही - रावसाहेब दानवे

कोणताही पक्ष युती तोडून सरकार स्थापन करणार नाही - रावसाहेब दानवे

औरंगाबाद : आमच्या दोन्ही पक्षात कुठलाही वाद नाही. दोन राजकीय पक्ष जेव्हा एकत्र येतात. तेव्हा प्रत्येक पक्ष आपली राजकीय ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. यामुळे एक स्पष्ट असून राज्यात भाजप-शिवसेनेचे महायुतीचे सरकार येणार आहे. कोणताही पक्ष युती तोडून सरकार स्थापन करणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता.4) माध्यमांशी बोलताना केला. 

जालन्याकडे जाण्यासाठी निघाले असताना, चिकलठाणा विमातनळावर दानवे यांनी संवाद साधला. दानवे म्हणाले, आमची निवडणूक पूर्व युती आहे. निवडणुकीत जनादेश जनतनेने आमच्या बाजूने दिला आहे. जनमताचा आदर करणे दोन्ही राजकीय पक्षाचे काम आहे. याच आदर करीत आमचं सरकार सत्तेत येणार आहे.असा विश्‍वास व्यक्‍त केला. 

भाजप-शिवसेने पैकी कोणीही युती तोडून अन्य कोणी युती तोडून वेगळा सरकार स्थापन करणार नाही. कारण आमची 30 वर्षांपासूनची यूती आहे. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा फॉर्म्युला ठरवला आहे. 2014 ची निवडणुक सोडता आम्ही एकत्र आहोत. यामुळे अडचण येणार नाही. आमचे ठरले आहे, योग्य वेळी दोन्ही पक्षाने नेते योग्य वेळी सांगतील असेही दानवे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com