दलित मते ही वंचितची मक्तेदारी नाही : इम्तियाज जलील

दलित समाज मोठ्या प्रमाणत एमआयएम बरोबर होता, आहे आणि यापुढे देखील राहील. -इम्तियाज जलील
Jaleel Ambedkar
Jaleel Ambedkar

औरंगाबादः एमआयएमला दलितांची मत मिळवण्यासाठी कुण्या नेत्याची गरज नाही. विधानसभा निवडणुकीनंतर किती दलित समाज आमच्या पाठीशी होता हे तुम्हाला दिसून येईल.  दलितांची मते वंचितची मक्तेदारी नाही असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.

वंचितसोबतची आघाडी तुटल्यानंतर आजपासून औरंगाबादेत एमआयएमकडून इच्छुकाच्या मुलाखतीला सुरूवात झाली. नांदेड, मालेगाव आणि पुण्यातील वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती आज प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतल्या. दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांनी वंचित आघाडीबाबत घेतलेली भूमिका हीच एमआयएमची अधिकृत भूमिका असल्याचे जाहीर केले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, वंचित सोबत आघाडी तुटली म्हणजे दलित मत आम्हाला मिळणार नाही असे जे बोलले जाते, त्यात काही तथ्य नाही. ओवेसी साहेब खासदार आणि मी आमदार झालो तेव्हा ते सिध्द देखील झाले आहे. पण आता वंचितसोबतची आघाडी तुटल्यामुळे आमच्या पक्षाला दलितांची मते मिळणार की नाही? यावर कथ्याकुट सुरू झाला आहे.

मुळात दलित समाजाची मते मिळवण्यासाठी आम्हाला दलित नेत्याची गरज नाही. दलित समाज मोठ्या प्रमाणत एमआयएम बरोबर होता, आहे आणि यापुढे देखील राहील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते स्पष्ट होईल असा पुनरुच्चार देखील इम्तियाज यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com