नगराध्यक्षांची निवड होणार सदस्यांमधून

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक कायद्यांत बदल करण्यात आले. यावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून आक्षेप घेण्यात आले होते. काही विषयांवर शिवसेनाही अनुकुल नव्हती.
council president election GR
council president election GR

नागपूर : माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळातील निर्णय बदलविण्याचा सपाटा ठाकरे सरकारने लावला आहे. नगर पालिका, नगर पंचायतमधील बहुसदस्य (प्रभाग) पद्धत रद्द केल्यानंतर आता नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड करण्याचा कायदा रद्द केला आहे. त्याचप्रमाणे बाजार समित्यांवरील विशेष निमंत्रित सदस्यांची नेमणूक करण्याचा आदेशही फिरवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्षांनी निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेत कायद्यात बदल केला होता. आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारने हा निर्णय रद्द केला असून पूर्वीप्रमाणे सदस्यांमधूनच अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 फेब्रुवारीला तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये अध्यक्षाची निवड सदस्यच करतील. नगर पालिका आणि नगर पंचायती निवडणुकीतील प्रभाग पद्धतीचा निर्णयही रद्द केला आहे.

बाजार समित्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था आणि राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र समजले जाते. बाजार समित्यांवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याने भाजपला त्यावर प्रवेश करता यावा म्हणून विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. याला तत्कालीन विरोधी पक्षाकडून विरोध दर्शविण्यात आला होता. आता ठाकरे सरकारने या नियुक्‍त्याही रद्द करण्याचा निर्णय घेतला असून 31 जानेवारीला संबंधित अध्यादेशही काढण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com