आता तरी मतदार याद्यांतले घोळ दुरुस्त करा -  जितेंद्र आव्हाड 

या निवडणुकीतही नेहमीचाच सावळा गोंधळ होता. मतदारांचा बराचसा वेळ हा याद्यांमधील आपले नाव शोधण्यात गेला. निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र असूनही अनेकांची नावे मतदार यादीमध्ये नव्हती. मृतांची नावे यादीत होती. तर जिवंत माणसांना मृत ठरवून त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली होती.- डाॅ. जितेंद्र आव्हाड
आता तरी मतदार याद्यांतले घोळ दुरुस्त करा -  जितेंद्र आव्हाड 

ठाणे :  ''मतदार याद्यांमधील घोळ आणि इव्हीएममधील बिघाड यामुळे सुमारे वीस टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.  याबाबत  निवडणूक आयोगाला जाब कोण विचारणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

याबाबत आव्हाड म्हणाले, ''या निवडणुकीतही नेहमीचाच सावळा गोंधळ होता. मतदारांचा बराचसा वेळ हा याद्यांमधील आपले नाव शोधण्यात गेला. निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र असूनही अनेकांची नावे मतदार यादीमध्ये नव्हती. मृतांची नावे यादीत होती. तर जिवंत माणसांना मृत ठरवून त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली होती. पतीचे नाव एका मतदान केंद्रावर तर पत्नीचे भलत्याच केंद्रावर; एकाच इमारतींमध्ये हजार मतदार; घराजवळ असलेल्या मतदान केंद्राऐवजी चार किमी अंतरावर मतदानासाठी मतदारांना जावे लागणे असे अनेक प्रकार या मतदान प्रक्रियेत बघायला मिळाले." 

या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करुन आव्हाड म्हणाले, "निवडणूक आयोगाला मतदार याद्यांमधील घोळ अनेक वर्षांपासून दूर करता आलेला नाही. त्यामुळे सुमारे वीस मतदारांना आपल्या राष्ट्रीय कर्तव्यापासून वंचित रहावे लागले आहे.  अनेक ठिकाणी इव्हीएम अचानक बंद पडून अचानक सुरू होत होती. डिजिटल इंडियाचा डंका पिटणाऱ्या भारतातील मतदार याद्यांमधील गोंधळ 50-60 वर्षांपूर्वीचाच आहे.  जर सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या न्यायाधिशाचे नाव यादीतून गायब झाले असते. तर त्याची तत्काळ दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली गेली असती. मात्र, येथे सामान्यांच्या मतांचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे.  त्यामुळेच संध्याकाळी मतदानाची टक्केवारी समजल्यावर जे वीस टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत त्याची जबाबदारी निवडणूक आयोगाला घ्यावीच लागेल," 

दरम्यान,  या याद्यांमधील घोळावर आतातरी तोडगा काढायला हवा. येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या बिनचूक बनवून सर्वांना त्यांचा अधिकार बजावू द्यावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com