'महाशिवआघाडी'सरकारमध्ये सहभाग घ्यावा; कॉंग्रेस आमदारांचा मतप्रवाह :आमदार शिरीष चौधरी

राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेसने सहभाग घ्यावा असा मतप्रवाह कॉंग्रेसच्या आमदारांनी एकमताने व्यक्त केला आहे. त्यावर 'हायकमांड'निर्णय घेईल आणि राज्यात लवकरच नवीन सरकार येईल, असा विश्‍वास रावेर विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
Congress MLA From Raver Confident About Congress-Sena-Ncp Forming Govenrment
Congress MLA From Raver Confident About Congress-Sena-Ncp Forming Govenrment

जळगाव : राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेसने सहभाग घ्यावा असा मतप्रवाह कॉंग्रेसच्या आमदारांनी एकमताने व्यक्त केला आहे. त्यावर 'हायकमांड'निर्णय घेईल आणि राज्यात लवकरच नवीन सरकार येईल, असा विश्‍वास रावेर विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात सत्तेचा तिढा निर्माण झाल्याने कॉंग्रेसने आपले आमदार जयपुर येथे सुरक्षितस्थळी पाठविले होते. आता आमदार आपापल्या मतदार संघात परतले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे सुध्दा आपल्या मतदार संघात परतले आहेत. कॉंग्रेसचे नेते व माजी विधानसभा सभापती (कै.)मधुकरराव चौधरी यांचे ते चिरंजीव आहेत. सन 2008 मध्ये याच मतदार संघातून ते अपक्ष विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला पाठींबा दिला होता. यावेळी ते कॉंग्रेसतर्फे निवडून आले आहेत.

राज्यात सध्या निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या तिढ्याबाबत आमदार शिरीश चौधरी म्हणाले, ''राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार येईल याचा आम्हाला विश्‍वास आहे. महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेसने सहभागी व्हावे अस मतप्रवाह सर्वच कॉंग्रेसच्या आमदारांचा आहे. त्याबाबतच्या स्वाक्षरीचे पत्रही पक्षश्रेष्ठींकडे दिलेले आहे. त्यावर पुढे विचार करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे, त्याबाबत निर्णय घेत आहेत."

पुन्हा निवडणुका होणार नाहीत
राज्यात राष्टपती राजवट लागू झाली आहे,पुन्हा निवडणुका होणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. याबाबत ते म्हणाले, की राष्ट्रपती राजवट लागू झाली म्हणून सत्ता येणार नाही,लगेच निवडणुका होतील हे म्हणणे चुक आहे. जर कोणी बहुमत सिध्द करून सत्ता स्थापनेचा दावा केला तर त्याचे सरकार स्थापन होईल. सत्ता स्थापनेसाठी महाशिवआघाडीची तयारी सुरू आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूका होण्याचा प्रश्‍नच येत नाही. तरीही निवडणुका लागल्या तर त्याला सामोरे जावू, असेही ते म्हणाले.

जयपूरला नेत्यांशी चर्चा
कॉंग्रेसचे सर्व आमदार जयपूर येथे सुरक्षितस्थळी होते. त्या ठिकाणी आमदार शिरीष चौधरीही होते. याबाबत ते म्हणाले, ''पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,अशोक चव्हाण या नेत्यांशी आमची चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही केले आहे. तसेच आमदारांनी सरकार स्थापनेबाबत आपले मतप्रवाहही खुल्या मनाने व्यक्त केले आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार येईल असा विश्‍वास आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com