नगर : मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने संगमनेर तालुक्यात पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी माजी कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात निघाले, पण पाऊस सुरू झाल्याने ते थांबले नाहीत. भर पावसात तालुका पिंजून काढत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर ते पोहचले .
नुकसानग्रस्त शेतीची तातडीने पंचनामे करुन शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत द्या, अशा सूचना थोरात यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी आमदार थोरात म्हणाले, " शेतकर्यांवर येणार्या विविध आपत्तींमधून दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष भरीव तरतूद केली पाहिजे. आपल्या सारख्या दुष्काळी भागात कर्ज घेवून मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती अवकाळी पावसाने उद्धवस्त झाली आहे."
"घरे व पिकांचे वादळाने मोठे नुकसान झाले असून, यात मोठी हानी झाली आहे. यामधून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. डाळींब , कांदा, टोमॅटो व विविध फळबागांचे मोठे नुकसान झाले असून जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे. "
दरम्यान, संगमनेर तालुक्याच्या पुर्व भागात नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू असताना सर्वत्र पाऊस सुरु झाला. थोरात यांनी भर पावसात शेतकर्यांच्या वाडी वस्तीवर व शेतात जाऊन भेटी दिल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.