नवी दिल्ली : राज्यात सरकार स्थापन करायचे की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज मुंबईला येत असून हे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मात्र, आज ही भेट झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपालांनी दिलेली रात्री साडेआठ वाजण्याची मुदत गाठणार का हा प्रश्न आहे.
दिल्लीत आता राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाळ, अहमद पटेल व मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर या तिन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खास विमानाने मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढले. म्हणून आम्ही दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचे ठरवले आहे. शरद पवारांची सोनिया गांधींशी फोनवरुन चर्चा झाली. त्यांनी काही वेळ मागितली होती. आम्ही आता चर्चा करुन पुढे काय करायचे हे ठरवू,''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.