२२० चा नारा देणारे नंतर गप्प का झाले : बाळासाहेब थोरात

शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला ईडीच्या माध्यमातून त्यांनी त्रास दिला. त्याचा बदला जनताच घेणार आहे. सरकारच्या खोटारडेपणाला जनता कंटाळली आहे. १५ दिवसांपूर्वी २२० चा नारा देणारा नंतर गप्प बसले, कारण त्यांना त्यांचे भविव्य दिसून आले, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला.
Congress State President Balasaheb Thorat After Voting With Familly
Congress State President Balasaheb Thorat After Voting With Familly

नगर : शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला ईडीच्या माध्यमातून त्यांनी त्रास दिला. त्याचा बदला जनताच घेणार आहे. सरकारच्या खोटारडेपणाला जनता कंटाळली आहे. १५ दिवसांपूर्वी २२० चा नारा देणारा नंतर गप्प बसले, कारण त्यांना त्यांचे भविव्य दिसून आले, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला.

जोर्वे येथे त्यांनी आज कुटुंबासह मतदान केले. पत्नी कांचन, मुली डाॅ. जयश्री आणि सविता यांनी मतदान केले. या वेळी बोलताना त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यात या सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्री आघाडीचाच होणार आहे.

सोडून गेलेल्यांनी चिंता करू नये
गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता थोरात यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस सोडून गेलेल्यांनी आमची चिंता करू नये, उलट नव्या जोमाने काँग्रेस उभी राहत असून, नवीन काँग्रेस पाहण्यास मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com