काॅंग्रेसचा शिवसेनेला `तोंड दाबून बुक्क्यांचा मार!`

ठंडा कर के खाओ, हे काॅंग्रेसचे जुने धोरण!
काॅंग्रेसचा शिवसेनेला `तोंड दाबून बुक्क्यांचा मार!`

मुंबई : काॅंग्रेस ही काय चीज आहे, याचे भान शिवसेनेला दोन दिवसांतील सर्व सत्तानाट्यामुळे आल्याची चर्चा सोशल मिडियात रंगली. आपल्याकडे सत्तास्थापनेइतके संख्याबळ असल्याचा दावा शिवसेना ही काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर करत होती. प्रत्यक्षात काॅंग्रेसने ऐन वेळी पाठिंब्याचे पत्र न दिल्याची सेनेची मोठी कोंडी झाली.

राज्यात काल घडलेल्या साऱ्या घडामोडींनंतर शिवसेना एकदम शांत झाली आहे. संजय राऊत हे रुग्णालयात असल्याने शिवसेनेचा बोलका चेहरा गेले चोवीस तास टिव्हीवर दिसलेला नाही. पण काॅंग्रेसने काल एवढा जबर धडा शिकवलाकी शिवसेनेला त्याविषयी तक्रार करण्यासही जागा उरलेली नाही.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार यासाठी नव्या राजकीय समिकरणाची जुळवाजुळवी जोरात सुरू होती. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार ही उत्कंठा असल्याने शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रवादीचे शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात दुपारी बैठक देखील पार पडली होती. पाठिंब्याची पत्रे तयार झाली होती. तर तिकडे दिल्लीत काल(ता. 11) दिवसभर कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकांचा रतिब सुरू होता. इकडे सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतच सत्तास्थापनेचा दावा करायचा असल्याने शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दिल्लीकडे डोळे लागले होते.

कॉंग्रेसच्या नेत्यांची साडेचार वाजता सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक सुरू होती. वेळ जात होता तशी उत्कंठा शिगेला पोहचत होती. शिवसेना आमदारांत तर जल्लोषाची तयारी सुरू होती. साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिवसेना नेते आदित्य ठाकरे इतर प्रमुख नेत्यांसह मातोश्री मधून राजभवनकडे निघाल्याची बातमी येताच राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटणार असे वातावरण होते. तिकडे दिल्लीत कॉंग्रेसची बैठक सुरूच होती. कॉंग्रेस शिवसेनेला पार्ठिबा देणार की नाही याबाबत तर्कवितर्क सुरू असल्याने निरूत्साह देखील दिसत होता.

सायंकाळी पावणेसात वाजता शिवसेनेचे नेते राजभवन वर पोहचले. इकडे राष्ट्रवादीचे सर्व नेते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे कॉंग्रेसच्या निर्णयाची वाट पाहत होते. राजभवन मधे शिवसेना नेते पाउणतास बसून होते. कॉंग्रेसचा अंतिम निर्णय होत नसल्याने शिवसेना व राष्ट्रवादीच्या गोटात निरूत्साह वाढत होता. अखेर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत कॉंग्रेसचा निर्णय झाला नाही याची खात्री पटल्यानंतर आणखीन तीन दिवसांची मुदत वाढवून मागितली पण राज्यपालांनी ती नाकारली. केवळ सत्तास्थापनेचा दावा करत शिवसेना राजभवन मधून परत मागे फिरल्याने संपुर्ण शिवसैनिक व आमदारांमधे निरूत्साहाचे वातावरण पसरले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com