भाजप सत्तेत येईल या धास्तीने काँग्रेसने खोटे मराठा आरक्षण दिले - रावसाहेब दानवे

भारतीय जनता पक्षाला २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाने काँग्रेस धास्तावले होते. त्यामुळे घाईगडबडीत मराठा समाजाला खोटे आरक्षण दिले, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
भाजप सत्तेत येईल या धास्तीने काँग्रेसने खोटे मराठा आरक्षण दिले - रावसाहेब दानवे

नाशिक : भारतीय जनता पक्षाला २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशाने काँग्रेस धास्तावले होते. त्यामुळे घाईगडबडीत मराठा समाजाला खोटे आरक्षण दिले, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.

भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी नाशिक येथे झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ''लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठे यश मिळाले. या यशाने काँग्रेस पक्ष खुपच धास्तावला होता. आपण परत राज्यात सत्तेवर येणार नाही याची त्यांना खात्री झाली. त्यामुळे घाईगडबडीत नारायण राणे यांची समिती नियुक्त केली. या समितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केले. हे आरक्षण टिकणारे नव्हतेच. कारण आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोग नियुक्त करावा लागतो. तो त्यांनी केलाच नव्हता. त्यामुळे ते आरक्षण टिकणारे नव्हतेच. त्यामुळे मराठा समाजाला त्याचा लाभ झाला नाही.''

भाजपने राज्यात गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खुप काम केले आहे. लोकांचे प्रश्न सोडवले. समाजात सलोखा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजप यशस्वी होईल असा विश्वास दानवे व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com